काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दिसतं नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा भाजपा प्रवेश...

  73

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसचं नेतृत्व दिसत नाही, अशी भूमिका व्यक्त करुन यापूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ज्यांना देशासाठी आणि समाजासाठी काम करण्याची ईच्छा आहे, त्यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व दिसत नाही. आपलाच नेता भारतीय  सैन्याबद्दल बोलत असेल तर कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडलेला असतो.  त्यामुळे काँग्रेस पक्षात निराशा आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे.

माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी देेखील काँग्रेसमधून बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.  काँग्रेस आपल्या चुका सुधारत नाही किंवा आपल्या चुकांमधून काही बोध घेण्यास कमी पडत आहे, असे तुम्हाला वाटते का ? असा सवाल फडवीसांनी पत्रकारांना विचारला.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस पुढे ही म्हणाले, काँग्रेसचं नेतृत्व दिशाहीन झालं आहे.  आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो. सत्तेत होतो, विरोधी पक्षात असताना, देशहिताची लाईन आम्ही कधीच सोडली नाही. त्यामुळे समाजातील लोक आमच्यासोबत आले आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती चांगली कामगिरी करेल. असा विश्वास व्यक्त केला. निवडणुका असो किंवा नसो आम्ही नेहमीच चांगल्या लाकांकडे पाहत असतो, त्यांचं काम चांगलं असेल तर त्यांना पक्षात प्रवेशही देतो.  दरम्यान जयश्री पाटील यांच्या सोबत जे कार्यकर्ते भाजपात आले आहेत. त्यांची सर्वांची काळजी भाजपा पक्षात घेतली जाते. आम्ही बाहेरुन आलो आहोत ही भावना कोणीही बाळगू नका. त्यामुळे सगळ्यांची काळजी घेण आमचं कर्तव्य आहे. अशी हमी फडणवीस यांनी दिली.
Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक