काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दिसतं नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा भाजपा प्रवेश...

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसचं नेतृत्व दिसत नाही, अशी भूमिका व्यक्त करुन यापूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ज्यांना देशासाठी आणि समाजासाठी काम करण्याची ईच्छा आहे, त्यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व दिसत नाही. आपलाच नेता भारतीय  सैन्याबद्दल बोलत असेल तर कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडलेला असतो.  त्यामुळे काँग्रेस पक्षात निराशा आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे.

माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी देेखील काँग्रेसमधून बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.  काँग्रेस आपल्या चुका सुधारत नाही किंवा आपल्या चुकांमधून काही बोध घेण्यास कमी पडत आहे, असे तुम्हाला वाटते का ? असा सवाल फडवीसांनी पत्रकारांना विचारला.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस पुढे ही म्हणाले, काँग्रेसचं नेतृत्व दिशाहीन झालं आहे.  आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो. सत्तेत होतो, विरोधी पक्षात असताना, देशहिताची लाईन आम्ही कधीच सोडली नाही. त्यामुळे समाजातील लोक आमच्यासोबत आले आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती चांगली कामगिरी करेल. असा विश्वास व्यक्त केला. निवडणुका असो किंवा नसो आम्ही नेहमीच चांगल्या लाकांकडे पाहत असतो, त्यांचं काम चांगलं असेल तर त्यांना पक्षात प्रवेशही देतो.  दरम्यान जयश्री पाटील यांच्या सोबत जे कार्यकर्ते भाजपात आले आहेत. त्यांची सर्वांची काळजी भाजपा पक्षात घेतली जाते. आम्ही बाहेरुन आलो आहोत ही भावना कोणीही बाळगू नका. त्यामुळे सगळ्यांची काळजी घेण आमचं कर्तव्य आहे. अशी हमी फडणवीस यांनी दिली.
Comments
Add Comment

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावल्या, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह