एअर इंडियाच्या विमानांना झालेय तरी काय? प्रवाशांचा जीव धोक्यात?

कोलकाता : एअर इंडिया कंपनीच्या बोईंग विमानांमध्ये गेल्या काही दिवसांत तांत्रिक बिघाडांची मालिकाच सुरू झाली आहे. १२ जूनला अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पाच दिवसांतच अशा पाच मोठ्या घटना घडल्या.



तांत्रिक अडथळ्यांमुळे ‘AI180’ चे कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग


सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या AI180 या विमानाचं सोमवारी मध्यरात्री नियोजित वेळेत १२ वाजून ४५ मिनिटांनी कोलकाता येथे लँडिंग झालं. पण विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे कोलकात्याहून मुंबईच्या दिशेनं विमानाचं उड्डाण लांबलं. जवळपास चार तासांहून अधिक काळ विमानतळावरच थांबल्यानंतरही सदर तांत्रिक समस्या दुरूस्त न झाल्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. सलग चार तास प्रयत्न करूनही बिघाड दुरुस्त न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. वैमानिकाने प्रवाशांना हे सांगितलं की, सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द केलं जात आहे.



सोमवारी दिवसभरात घडलेल्या इतर घटना


AI2493 (मुंबई–अहमदाबाद) : तांत्रिक व्यवस्थेतील अडचणीमुळे उड्डाण रखडले आणि क्रू मेंबर्सचा ड्यूटी कालावधी संपला, परिणामी संपूर्ण फ्लाइट रद्द!


AI (दिल्ली–रांची) : टेकऑफनंतर तांत्रिक बिघाडाची संशयास्पद लक्षणं आढळताच वैमानिकाने विमान पुन्हा दिल्लीला परत नेलं.


AI315 (हाँगकाँग–दिल्ली) : हाँगकाँगहून निघालेलं विमान हवेत गेल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडाची शंका आल्याने तत्काळ परतीचं निर्णय, विमान पुन्हा हाँगकाँगला उतरवण्यात आलं.



बोईंगची भीती, एअर इंडियाची निष्काळजीपणा?


या साऱ्या घटनांमुळे एकच मोठा प्रश्न निर्माण होतो की, एअर इंडियाची विमाने प्रवाशांसाठी सुरक्षित आहेत का? तांत्रिक बिघाडाच्या एकामागोमाग एक घटना आणि भीषण अपघाताने आता प्रवाशांचा विश्वास हादरत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उड्डाण करणाऱ्या भारतीय एअरलाइन्सकडून अशा निष्काळजीपणाची अपेक्षा न करता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे.

Comments
Add Comment

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची