Amarnath Yatra : १ जुलैपासून अमरनाथ यात्रा मार्ग 'नो-फ्लाईंग झोन' घोषित!

श्रीनगर : अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरू होणार आहे. यात्रा आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर सरकारने गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार यात्रेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी पहलगाम आणि बालताल एक्सप्रेसवर हवाई निर्बंध लागू केले आहेत. यामुळे, संपूर्ण तीर्थयात्रा मार्ग आता 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.


सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांसह अमरनाथ यात्रेचे सर्व मार्ग 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित केले आहेत. ही बंदी पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांना व्यापणाऱ्या सर्व प्रकारच्या हवाई उपकरणांना लागू आहे. यामध्ये यूएव्ही, ड्रोन आणि फुगे असा सर्वांचा समावेश आहे.



अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि यात्रेला जातात. या काळात सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी कडक व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. हे सुरक्षा निर्देश १ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत लागू असतील. तथापि, वैद्यकीय आणीबाणी, आपत्ती व्यवस्थापन किंवा सुरक्षा दलांनी राबवलेल्या देखरेखीच्या कारवाया अशा काही प्रकरणांमध्ये हा निर्णय लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अपवादांसाठी तपशीलवार मानक कार्यपद्धती (एसओपी) नंतर जारी केल्या जातील.


अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रा ही लोकांची यात्रा आहे यावर भर देत जनतेकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तयारी केली जात आहे. यात्रेसाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या (CAPF) ५८० कंपन्या तैनात केल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या