Amarnath Yatra : १ जुलैपासून अमरनाथ यात्रा मार्ग 'नो-फ्लाईंग झोन' घोषित!

श्रीनगर : अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरू होणार आहे. यात्रा आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर सरकारने गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार यात्रेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी पहलगाम आणि बालताल एक्सप्रेसवर हवाई निर्बंध लागू केले आहेत. यामुळे, संपूर्ण तीर्थयात्रा मार्ग आता 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.


सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांसह अमरनाथ यात्रेचे सर्व मार्ग 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित केले आहेत. ही बंदी पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांना व्यापणाऱ्या सर्व प्रकारच्या हवाई उपकरणांना लागू आहे. यामध्ये यूएव्ही, ड्रोन आणि फुगे असा सर्वांचा समावेश आहे.



अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि यात्रेला जातात. या काळात सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी कडक व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. हे सुरक्षा निर्देश १ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत लागू असतील. तथापि, वैद्यकीय आणीबाणी, आपत्ती व्यवस्थापन किंवा सुरक्षा दलांनी राबवलेल्या देखरेखीच्या कारवाया अशा काही प्रकरणांमध्ये हा निर्णय लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अपवादांसाठी तपशीलवार मानक कार्यपद्धती (एसओपी) नंतर जारी केल्या जातील.


अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रा ही लोकांची यात्रा आहे यावर भर देत जनतेकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तयारी केली जात आहे. यात्रेसाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या (CAPF) ५८० कंपन्या तैनात केल्या जात आहेत.

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय