Amarnath Yatra : १ जुलैपासून अमरनाथ यात्रा मार्ग 'नो-फ्लाईंग झोन' घोषित!

श्रीनगर : अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरू होणार आहे. यात्रा आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर सरकारने गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार यात्रेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी पहलगाम आणि बालताल एक्सप्रेसवर हवाई निर्बंध लागू केले आहेत. यामुळे, संपूर्ण तीर्थयात्रा मार्ग आता 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.


सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांसह अमरनाथ यात्रेचे सर्व मार्ग 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित केले आहेत. ही बंदी पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांना व्यापणाऱ्या सर्व प्रकारच्या हवाई उपकरणांना लागू आहे. यामध्ये यूएव्ही, ड्रोन आणि फुगे असा सर्वांचा समावेश आहे.



अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि यात्रेला जातात. या काळात सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी कडक व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. हे सुरक्षा निर्देश १ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत लागू असतील. तथापि, वैद्यकीय आणीबाणी, आपत्ती व्यवस्थापन किंवा सुरक्षा दलांनी राबवलेल्या देखरेखीच्या कारवाया अशा काही प्रकरणांमध्ये हा निर्णय लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अपवादांसाठी तपशीलवार मानक कार्यपद्धती (एसओपी) नंतर जारी केल्या जातील.


अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रा ही लोकांची यात्रा आहे यावर भर देत जनतेकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तयारी केली जात आहे. यात्रेसाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या (CAPF) ५८० कंपन्या तैनात केल्या जात आहेत.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी