Amarnath Yatra : १ जुलैपासून अमरनाथ यात्रा मार्ग 'नो-फ्लाईंग झोन' घोषित!

श्रीनगर : अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरू होणार आहे. यात्रा आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर सरकारने गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार यात्रेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी पहलगाम आणि बालताल एक्सप्रेसवर हवाई निर्बंध लागू केले आहेत. यामुळे, संपूर्ण तीर्थयात्रा मार्ग आता 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.


सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांसह अमरनाथ यात्रेचे सर्व मार्ग 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित केले आहेत. ही बंदी पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांना व्यापणाऱ्या सर्व प्रकारच्या हवाई उपकरणांना लागू आहे. यामध्ये यूएव्ही, ड्रोन आणि फुगे असा सर्वांचा समावेश आहे.



अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि यात्रेला जातात. या काळात सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी कडक व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. हे सुरक्षा निर्देश १ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत लागू असतील. तथापि, वैद्यकीय आणीबाणी, आपत्ती व्यवस्थापन किंवा सुरक्षा दलांनी राबवलेल्या देखरेखीच्या कारवाया अशा काही प्रकरणांमध्ये हा निर्णय लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अपवादांसाठी तपशीलवार मानक कार्यपद्धती (एसओपी) नंतर जारी केल्या जातील.


अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रा ही लोकांची यात्रा आहे यावर भर देत जनतेकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तयारी केली जात आहे. यात्रेसाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या (CAPF) ५८० कंपन्या तैनात केल्या जात आहेत.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे