अंधेरी पश्चिम भागांत गुरुवार, शुक्रवारी पाणी नाही

गोखले पुलाखाली जलवाहिनीची दुरुस्ती


मुंबई (खास प्रतिनिधी) : अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील १,३५० मिलीमीटर व्यासाचे प्रवाह नियंत्रण झडप (फ्लो कंट्रोल वॉल्व्ह) दुरुस्ती आणि वेसावे जलवाहिनीवरील ९०० मिलीमीटर व्यासाचे फुलपाखरू झडप (बटरफ्लाय वॉल्व्ह) बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. गुरुवार, १९ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपासून शुक्रवार, २० जून २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत एकूण ११ तास हे काम करण्याचे नियोजित आहे.


या कामादरम्यान संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा ११ तास बंद करावा लागणार आहे. त्यामुळे के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती कालावधीत म्हणजे गुरुवार, १९ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपासून शुक्रवार, २० जून २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तरी भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद


विले पार्ले पश्चिम : लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मीलन भूयारी मार्ग (सबवे), जुहू विलेपार्ले विकास योजना (जे. व्ही. पी. डी. स्कीम), जुहू गावठाण क्रमांक ०३, व्ही. एम. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०) मोरागाव (जे. व्ही. पी. डी.) मोरागाव, जुहू गावठाण क्रमांक ०१ आणि ०२, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०) गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी, अंधेरी (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते मध्यरात्री १२.३०)

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन