स्थानिकांना दिलासा ! संरक्षण भिंत पाडणार नाही; राज्य सरकारची हमी...

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) आणि रेडिओ क्लबदरम्यान प्रस्ताविक जेट्टीसाठी समुद्रलगत असणारी सरंक्षण भिंत ३० जूनपर्यंत पाडणार नाही. अशी हमी राज्य सरकारने स्थानिकांना दिली. त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. कोणतेही अधिकृत परवानगी नसताना, जेट्टीचं काम सुरु करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. त्यामुळे प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती..

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सोमवारी पार पाडल्यामुळे राज्य सरकारने स्थानिकांच्या बाजूने दिलासादायक निर्णय घेतला आहे.  त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. जेट्टीच्या प्रकल्पासाठी भिंत पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली असती, तर नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले असते.

अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. मुळातच प्रकल्पासाठी भिंत का पाडण्यात येत आहे ?  असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. समुद्रलगत असणारी भिंत ७० वर्ष जुनी आहे. प्रास्ताविक जेट्टीचा प्रकल्प हा सार्वजनिक पायाभूत सुविधा उपक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही