Railway Ticket Booking: १ जुलैपासून तत्काळ तिकिटासाठी ओटीपी द्यावा लागणार - अश्विनी वैष्णव, काय आहेत नवे बदल जाणून घ्या....

प्रतिनिधी: आता रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार बेस ओटीपी (Otp Authentication) क्रमांक द्यावा लागणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे.१ तारखेपासून हा नियम लागू होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. मागील महिन्यात रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवे नियम जाहीर केले होते.

नव्या नियमानुसार आता ग्राहकांना तिकिट बुक करण्यासाठी ओटीपी टाकणे अनिवार्य असणार आहे जेणेकरून ही प्रकिया पारदर्शक होणार आहे. याशिवाय रेल्वे मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या प्रवासापूर्वी २४ तास आधी अंतिम प्रवाशांची यादी (Chart) बनवली जाऊ शकते या कल्पनेची तयारीही रेल्वेने सुरु केली आहे. याची सध्या चाचपणी सुरू आहे. सध्याच्या घडीला तिकिट कन्फर्म आहे का हे केवळ ४ तास प्रवासाआधी कळते. अनेक वेळा अशा प्रसंगी संभ्रमाची परिस्थिती होते त्यावर मात करण्यासाठीही रेल्वे प्रयत्नशील राहणार आहे.

१ जुलैपासून तत्काळ तिकिट नोंदणीसाठी आधार जोडलेल्या प्रवाश्यांना बुकिंग करण्यासाठी मोबाईल अँप व आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर करता येणार आहे. आता १५ जुलै पासून प्रवाश्यांना तत्काळ तिकिटासाठी ओटीपी अनिवार्य (Mandatory) करण्यात आले आहे. तत्काळ तिकिट (Computerised Passenger Reservation System) काऊंटरवर व अधिकृत एजंटकडून ओटीपी माध्यमातून बुकिंग करता येईल.

याखेरीज कठीण प्रसंगी मोठ्या प्रमाणातील ग्रुप बुकिंग होऊ नये म्हणून रेल्वेने ऐनवेळी बुकिंग चालू झाल्यानंतर अधिकृत एजंटकडून पहिल्या ३० मिनिटांत तिकिट घेण्यास अथवा विकण्यास प्रतिबंध केला आहे. वातानुकूलित (AC Class) सा ठी सकाळी १० ते १०.३० पर्यंत व विना वातानुकूलित (Non AC) साठी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान हे प्रतिबंध लागू होणार आहेत‌. तिकीट विक्रीत पारदर्शकता आणण्यास रेल्वेने हा महत्वाकांक्षी उपक्रम चालू केला आहे.

तांत्रिकदृष्ट्या CRIS, IRCTC या रेल्वेच्या विभागाकडून सिस्टिम मध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जाऊ शकतात.
Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही