Railway Ticket Booking: १ जुलैपासून तत्काळ तिकिटासाठी ओटीपी द्यावा लागणार - अश्विनी वैष्णव, काय आहेत नवे बदल जाणून घ्या....

प्रतिनिधी: आता रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार बेस ओटीपी (Otp Authentication) क्रमांक द्यावा लागणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे.१ तारखेपासून हा नियम लागू होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. मागील महिन्यात रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवे नियम जाहीर केले होते.

नव्या नियमानुसार आता ग्राहकांना तिकिट बुक करण्यासाठी ओटीपी टाकणे अनिवार्य असणार आहे जेणेकरून ही प्रकिया पारदर्शक होणार आहे. याशिवाय रेल्वे मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या प्रवासापूर्वी २४ तास आधी अंतिम प्रवाशांची यादी (Chart) बनवली जाऊ शकते या कल्पनेची तयारीही रेल्वेने सुरु केली आहे. याची सध्या चाचपणी सुरू आहे. सध्याच्या घडीला तिकिट कन्फर्म आहे का हे केवळ ४ तास प्रवासाआधी कळते. अनेक वेळा अशा प्रसंगी संभ्रमाची परिस्थिती होते त्यावर मात करण्यासाठीही रेल्वे प्रयत्नशील राहणार आहे.

१ जुलैपासून तत्काळ तिकिट नोंदणीसाठी आधार जोडलेल्या प्रवाश्यांना बुकिंग करण्यासाठी मोबाईल अँप व आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर करता येणार आहे. आता १५ जुलै पासून प्रवाश्यांना तत्काळ तिकिटासाठी ओटीपी अनिवार्य (Mandatory) करण्यात आले आहे. तत्काळ तिकिट (Computerised Passenger Reservation System) काऊंटरवर व अधिकृत एजंटकडून ओटीपी माध्यमातून बुकिंग करता येईल.

याखेरीज कठीण प्रसंगी मोठ्या प्रमाणातील ग्रुप बुकिंग होऊ नये म्हणून रेल्वेने ऐनवेळी बुकिंग चालू झाल्यानंतर अधिकृत एजंटकडून पहिल्या ३० मिनिटांत तिकिट घेण्यास अथवा विकण्यास प्रतिबंध केला आहे. वातानुकूलित (AC Class) सा ठी सकाळी १० ते १०.३० पर्यंत व विना वातानुकूलित (Non AC) साठी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान हे प्रतिबंध लागू होणार आहेत‌. तिकीट विक्रीत पारदर्शकता आणण्यास रेल्वेने हा महत्वाकांक्षी उपक्रम चालू केला आहे.

तांत्रिकदृष्ट्या CRIS, IRCTC या रेल्वेच्या विभागाकडून सिस्टिम मध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जाऊ शकतात.
Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय