आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज​ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थाना​साठी सज्ज

  29

आळंदी : जगतगुरूश्री संत तुकाराम महाराज​ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यां​चा प्रस्थान​ सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. या अनुपम प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी पोलिस दल, प्रशासकीय यंत्रणांची सज्ज आहेत. आळंदी पोलिस ठाण्यानं यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके ​असं जवळपास २ हजार मनुष्यबळ​ तैनात केलयं. ​


​आषाढी वारीला सुरुवात झालीय. विठूरायाच्या भेटीची आस असलेले वारकरी ज्ञानबा-तुकाराम​चा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं देहू आणि आळंदी इथं ​दाखल होताहेत. ​​बुधवारी ​ ​जगतगुरू​ श्री संत तुकाराम महारा​जांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.


प्रस्थान सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांच्या गर्दीनं देहूनगरी फुललीय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी​ आलेल्या वारकरी-भाविकां​साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ​



देहू नगरपंचाय​तीनं मुख्य मंदिर व परिसर, इंद्रायणी घाट, वैकुंठस्थान मंदिर, पीएमपी बसस्टॉप, देहूतील मुख्य रस्ते, अनगडशहा बाबा दर्गा, पाण्याचे टँकर उपलब्ध असणारी ठिकाणे, उपचार केंद्र, पोलिस मदत केंद्र आदी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेत.​ यातून संपूर्ण पालखी सोहळ्यावर बारीक नजर ठेवण्यात येणारेय. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पाल​खी प्रस्थान सोहळा होणार असल्यानं आळंदीमध्येही दिंड्या मोठ्या संख्येने दाखल होताहेत. प्रस्थान सोहळा कालावधीत २०​ जूनपर्यंत आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. ​यामुळं आजपासून​ शहरात वाहनांना प्रवेश बंदी ​घातली आहे.केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यावर यंदा अतिपावसाचे सावट आहे.​ माउली मंदिर आणि संपूर्ण आळंदीचा ​प्रस्थान सोहळा हा इंद्रायणी नदी घाटाभोवती पार पडत असतो. या काळात इंद्रायणी नदी घाटावर अनेक वारकरी जमा होतात. प्रस्थान सोहळा अवघ्या​ दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. ​स​हा दिवसांपूर्वीच इंद्रायणीची पाणीपातळी चांगलीच वाढलीय. ​चार दिवसांपासून इंद्रायणी नदीपात्र परिसरात मावळपासून आळंदीपर्यंत ​पाऊस सुरू आहे.​ हवामान विभागानंही आगामी ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिलाय. त्यामु​ळं या सोहळ्यासाठी हवामानाचा अंदाज लावून नदीच्या पाणीपातळीचा विचार करत प्रशासनाला अधिक सतर्क रहाव​ं लागणार ​आहे.

Comments
Add Comment

राजुरीत एसटी बसेसकडून नियमांचे उल्लंघन

बसस्थानकावर एसटी थांबत नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय पुणे : राजुरी (ता.जुन्नर) येथील बसस्थानकावर लांब

म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला

नागरिकांची गैरसोय दूर संगमनेर : शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर

झोपड्यांवर कारवाई... मग बंगलेवाल्यांना माफी कशी? सुजय विखेंचा थेट इशारा

शिर्डीतून सुरू राजकीय उकळत्या वातावरणाची नांदी शिर्डी : शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडले जाणार, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पुणे:  तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर (Kundmala Bridge Collapses), पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व

पाच दिवस आधीच निघाली होती नवीन पुलाची वर्क ऑर्डर, मग कुंडमळा भीषण दुर्घटनेला जबाबदार कोण?

कुंडमळा : मावळ तालुक्यातील कुंडमळा ​या प्रसिद्ध पर्यटनस्थ​ळी रविवारी झालेल्या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार

शालेय निधी व्यवहारात गैरप्रकार आढळ्यास कारवाई होणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा आदेश...

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. शिक्षण