'शक्य तितक्या लवकर तेहरान सोडा, भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा'

तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील लढाई तीव्र होत चालली आहे. यामुळे सुरक्षिततेसाठी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर तेहरानमधून बाहेर पडावे. इराण सोडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी इराण - आर्मेनिया सीमेवरुन आर्मेनियात प्रवेश करावा आणि इराणमधून बाहेर पडावे. इराणमध्ये असलेल्या तसेच इराण सोडत असलेल्या भारतीयांनी भारताच्या दूतावासाच्या संपर्कात राहावे; असे आवाहन भारत सरकारने केले आहे. भारताच्या इराणमधील दूतावासाने भारतीयांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. +98 9010144557, +98 9015993320, +91 8086871709 या नंबरवर संपर्क साधा, असे आवाहन भारताच्या दूतावासाने इराणमधील भारतीयांना केले आहे. तसेच इस्रायलमध्ये असलेल्या भारतीयांना +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905, +91-9968291988 या नंबरवर संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायल आणि इराण दोन्ही ठिकाणी 24*7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


इराण नवनव्या अण्वस्त्रांची निर्मिती करत आहे. यामुळे आमच्या सुरक्षेला धोका आहे, असे सांगत इस्रायलने इराण विरोधात हवाई हल्ले सुरू केले. हल्ले करताना इस्रायलने इराणचे अण्वस्त्र निर्मिती प्रकल्प, क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प, अण्वस्त्र साठा, क्षेपणास्त्र साठा, सैन्य तळ, विमानतळ आणि लढाऊ विमानं, महत्त्वाचे सैन्याधिकारी आणि गुप्तचर अधिकारी यांना लक्ष्य केले. याउलट इराणने प्रत्युत्तर देताना अनेक क्षेपणास्त्र इस्रायलमधील नागरी वस्तीला लक्ष्य करुन डागली.


इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या सैन्य शक्तीचे आणि गुप्तचर यंत्रणेचे नुकसान झाले. याउलट इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये जीवितहानी झाली. सैन्य शक्तीचे इराणच्या तुलनेत कमी नुकसान झाले.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल