Block Deal Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मोठे पाऊल एशियन पेंटसमधून काढली १८७६ कोटींची गुंतवणूक

प्रतिनिधी: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) कंपनीने एशियन पेंटस (Asian Paints) कंपनीतील आपले ०.४९% म्हणजेच ८५ लाख समभाग (Shares) ब्लॉक डील (Block Deal) मधून विकले आहेत. कंप नीने १८७६ कोटी रूपये मूल्यांकन (Valuation) असलेल्या समभागांची विक्री केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची आस्थापना (Entity) असलेल्या सिद्धार्थ कर्मशिअलने ही विक्री केली आहे. कंपनीच्या एकूण ०.९ इक्विटी असलेल्या या समभा गाचे भागभांडवल ICICI Prudential Mutual Fund कंपनीने खरेदी केले आहेत.


प्री शेअर (Pre Share Price) २२०७ रूपये प्रति शेअर्सवर हे ब्लॉक डील झाले आहे. सोमवारच्या शेअर बाजार सत्रानंतर एशियन पेंट्सचे शेअर्स १.२८ टक्क्यांनी वाढून २,२४३.६५ रूपयांवर पोहोचला होता. हा समभाग मागील बाजार बंदच्या वेळी २,२१५.३० रुपये पातळीवर पोहोचला होता. काल शेअर बाजार सत्रादरम्यान अधिकृत डेटापूर्वी ब्लॉक डीलच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनंतर कंपनीचे शेअर्स वधारले आहेत. गेल्या एक वर्षात कंपनीच्या समभागात २३.२१ टक्क्याने घसरण झाली होती. तर काल एशियन पेंटसचा समभाग ३३९४ रूपये पातळी घालू शकला होता. बाजारातील माहितीनुसार, कंपनीने एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २.१५ लाख कोटी रुपये आहे. आज दुपारपर्यंत कंपनीच्या समभागात ०.९०% वाढ झाल्याने कंपनीचा समभाग २२६५ रूपयांनी बाजारात विकला जात आहे.


यापूर्वी कंपनीने ब्लॉकडील बदल एक्सचेंजला कळवताना, 'कृपया लक्षात घ्या की सिद्धांत कमर्शियल्स लिमिटेड मार्फत रिलायन्स इंडस्ट्रीजकडे असलेले एशियन पेंट्सचे ३.५ कोटी इक्विटी शेअर्स आज २,२०१ रुपये प्रति शेअर या किमतीला विकले गेले आहेत, ज्यामुळे एशियन पेंट्सचे ८७ लाख इक्विटी शेअर्स शिल्लक आहेत," असे आरआयएलने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका

बारामती विमान अपघातातील पीडितांना साश्रू नयनांनी निरोप; फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या अंत्यदर्शनावेळी भावनिक क्षण

मुंबई : काल २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा ठरला आहे.काल बारामती येथे अजीत पवारांचा विमान अपघातात

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार

प्रदूषणाची आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर

विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? पायलटने दिलेला 'तो' शेवटचा संदेश आणि प्राथमिक अहवाल समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बारामती : महाराष्ट्र राज्याचे

हातातील ‘घड्याळ’ हीच ठरली शेवटची ओळख!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान