वृद्ध वडिलांनी मुलाला आणि सैन्यात असलेल्या पत्नीने पतीला दिला अखेरचा निरोप, दोन वैमानिक अनंतात विलीन

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात दोन मोठे अपघात झाले. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळले. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त 11A या आसनावरील प्रवासी वाचला. काही दिवसांच्या अंतराने उत्तराखंडमध्ये केदारनाथच्या दिशेने भाविकांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला. या दोन दुर्घटनांमुळे भारताने दोन गुणी वैमानिक (पायलट) गमावले. दोन्ही वैमानिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.





मुंबईत एअर इंडियाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना त्यांच्या वृद्ध वडिलांनी पुष्करराज यांनी पवईच्या घरी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. ज्या वयात मुलाचा आधार घेऊन जगावे असे वाटते त्या वयात मुलाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ पुष्करराज यांच्यावर आली. बराच वेळ पुष्करराज हात जोडून शांत उभे होते. अखेर त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. ते रडण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. मुंबईत असे शोकाकूल वातावरण असताना जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान त्यांचे पती, लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंग चौहान (निवृत्त) यांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत होत्या. राजवीर सिंग हे १५ जून रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे पायलट होते.

मुंबईत झाले अंत्यसंस्कार

कॅप्टन सुमित सभरवाल यांचे पार्थिव एका शवपेटीत ठेवण्यात आले आणि सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. कुटुंबीयांनी कॅप्टन सभरवाल यांचे पार्थिव पवई येथील जल वायु विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेले. त्यांचे पार्थिव तासभर घरी ठेवण्यात आले नंतर चकाला येथे विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुळ्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी लेफ्टनंट कर्नलवर येऊन पडली

रविवारी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जयपूरचे रहिवासी पायलट राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय सैन्यात १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आणि विविध भूप्रदेशांमध्ये उड्डाण मोहिमांचा त्यांना व्यापक अनुभव होता. रविवारी केदारनाथजवळ एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आणि पायलट चौहानसह सात जणांचा मृत्यू झाला. आता राजवीर यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांच्यावर एकटीने जुळ्या मुलांचे संगोपन करण्याची वेळ आली आहे. चारच महिन्यांपूर्वी चौहान दांपत्याला जुळी मुले झाली होती.

 
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला