वृद्ध वडिलांनी मुलाला आणि सैन्यात असलेल्या पत्नीने पतीला दिला अखेरचा निरोप, दोन वैमानिक अनंतात विलीन

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात दोन मोठे अपघात झाले. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळले. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त 11A या आसनावरील प्रवासी वाचला. काही दिवसांच्या अंतराने उत्तराखंडमध्ये केदारनाथच्या दिशेने भाविकांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला. या दोन दुर्घटनांमुळे भारताने दोन गुणी वैमानिक (पायलट) गमावले. दोन्ही वैमानिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.





मुंबईत एअर इंडियाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना त्यांच्या वृद्ध वडिलांनी पुष्करराज यांनी पवईच्या घरी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. ज्या वयात मुलाचा आधार घेऊन जगावे असे वाटते त्या वयात मुलाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ पुष्करराज यांच्यावर आली. बराच वेळ पुष्करराज हात जोडून शांत उभे होते. अखेर त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. ते रडण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. मुंबईत असे शोकाकूल वातावरण असताना जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान त्यांचे पती, लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंग चौहान (निवृत्त) यांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत होत्या. राजवीर सिंग हे १५ जून रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे पायलट होते.

मुंबईत झाले अंत्यसंस्कार

कॅप्टन सुमित सभरवाल यांचे पार्थिव एका शवपेटीत ठेवण्यात आले आणि सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. कुटुंबीयांनी कॅप्टन सभरवाल यांचे पार्थिव पवई येथील जल वायु विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेले. त्यांचे पार्थिव तासभर घरी ठेवण्यात आले नंतर चकाला येथे विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुळ्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी लेफ्टनंट कर्नलवर येऊन पडली

रविवारी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जयपूरचे रहिवासी पायलट राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय सैन्यात १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आणि विविध भूप्रदेशांमध्ये उड्डाण मोहिमांचा त्यांना व्यापक अनुभव होता. रविवारी केदारनाथजवळ एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आणि पायलट चौहानसह सात जणांचा मृत्यू झाला. आता राजवीर यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांच्यावर एकटीने जुळ्या मुलांचे संगोपन करण्याची वेळ आली आहे. चारच महिन्यांपूर्वी चौहान दांपत्याला जुळी मुले झाली होती.

 
Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे