परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने अखेर सोडल मौन

मुंबई : अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिकडीने 'हेरा फेरी' सिनेमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.आता चाहत्यांचं 'हेरा फेरी ३'कडे लक्ष लागलं आहे.मात्र परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याने सर्वांना धक्का बसला आहे.


त्यांच्या बाबुराव आपटे भूमिकेची जादू आजही कायम आहे. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर बराच वाद झाला. अक्षयने त्यांच्यावर नुकसान भरपाईचा दावा केला. या सर्व प्रकरणावर आता अक्षयने मौन सोडलं आहे.


एका मुलाखतीत अक्षय कुमारला 'हेरा फेरी ३'वर प्रश्न विचारण्यात आला. सिनेमा नक्की येणार आहे का? नक्की काय घडतंय? यावर तो म्हणाला, ""जे घडतंय ते तुमच्यासमोरच घडतंय. तुम्हा माध्यमांना सगळं माहितच आहे. सगळं काही ठीक व्हावं अशीच माझीही आशा आहे. मला खात्री आहे की सगळं चांगलं होईल.


दरम्यान, परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' मानधनाच्या कारणामुळे सिनेमा सोडला का? अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावर परेश रावल म्हणाले, "प्रेक्षकांच्या प्रेमाची तुलना पैशांसोबत होऊच शकत नाही. सध्या मला ही भूमिका करायची नाही इतकंच यामागचं कारण आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मला खरोखरंच या घडीला ही भूमिका साकारायची इच्छा नाही असंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सोबत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत आणि यापुढेही करु. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत."

Comments
Add Comment

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर