मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने विजेची बचत करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येत असून सुद्धा अनेक शासकीय, महापालिका कार्यालयात वीज वाया घालण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे.
वीजेची बचत करणे अधिकाऱ्यांची जबाबदार आहे; परंतु काही अधिकाऱ्यांकडून विजेची बचत होताना दिसत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे. भांडुप (प.) येथील मनपा एस विभागातील रस्ते विभागाचे रस्ते अभियंता कल्पना मेस्त्री (कोतवाल), अलंकार वीर, सुशांत पाटील या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सदर संबंधित अधिकारी जागेवर नसताना सुद्धा लाईट, पंखा चालू असल्याचे समोर आले असून येणाऱ्या आगावू वीज बिलाचा भुर्दंड पालिकेला सोसावा लागत आहे.
कामानिमित्त व इतर ठिकाणी जाण्यापूर्वी लाईट, पंखा बंद करुन विजेची बचत करायची सोडून, वीज वाया घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वराडे यांनी मनपा एस विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याकडे केली आहे.