अरे बापरे! बुलढाण्यात नवीन आजार! केसगळती, नखगळतीनंतर आता हातांना पडताहेत भेगा?

बुलढाणा : बुलढाणा हा जिल्हा काही दिवसांपूर्वी अजब आजारांमुळे चर्चेचा विषय बनला होता. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात लोकांच्या डोक्यावरील केस झपाट्याने गळत होते. त्यानंतर नख गळतीचा अजब प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता येथील नागरिकांच्या हातांना भेगा पडण्याचा प्रकार समोर आला आहे.



आरोग्य विभागाने केली तपासणी


मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या गावातील नागरिकांच्या हातांना भेगा पडत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत. ही बाब समोर येताच आरोग्य पथक शेलगाव देशमुख या गावात दाखल झाले आहे. या पथकाकडून २० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अनेकांवर सध्या उपचार चालू आहेत. सतत वेगवेगळे आजाराचे गंभीर प्रकार उजेडात येत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.


आरोग्य विभागाकडून तातडीने उपचार सुरू


विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गावात हा प्रकार घडला आहे. आरोग्य पथकाकडून रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील १२ महिने ते ५ वर्षांपासून आहे. मागील १-२ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर हा आजार संसर्गजन्य नसून या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही. विविध प्रकारचे प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डॉक्टर सांगतात.


दरम्यान, सर्व रूग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

Moshi incident : पुणे जिल्ह्यातील मोशी दुर्घटनेच्या ठिकाणी ७२ तासांनंतरही बचावकार्य सुरू

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला असून दुर्घटनाग्रस्त

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :

kharif pik vima : खरीप २०२६ पीक विम्यासाठी नवे नियम लागू; अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या 5 गोष्टी जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत (Crop Insurance) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदा पीक विमा (Pik Vima)

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन