अरे बापरे! बुलढाण्यात नवीन आजार! केसगळती, नखगळतीनंतर आता हातांना पडताहेत भेगा?

बुलढाणा : बुलढाणा हा जिल्हा काही दिवसांपूर्वी अजब आजारांमुळे चर्चेचा विषय बनला होता. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात लोकांच्या डोक्यावरील केस झपाट्याने गळत होते. त्यानंतर नख गळतीचा अजब प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता येथील नागरिकांच्या हातांना भेगा पडण्याचा प्रकार समोर आला आहे.



आरोग्य विभागाने केली तपासणी


मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या गावातील नागरिकांच्या हातांना भेगा पडत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत. ही बाब समोर येताच आरोग्य पथक शेलगाव देशमुख या गावात दाखल झाले आहे. या पथकाकडून २० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अनेकांवर सध्या उपचार चालू आहेत. सतत वेगवेगळे आजाराचे गंभीर प्रकार उजेडात येत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.


आरोग्य विभागाकडून तातडीने उपचार सुरू


विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गावात हा प्रकार घडला आहे. आरोग्य पथकाकडून रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील १२ महिने ते ५ वर्षांपासून आहे. मागील १-२ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर हा आजार संसर्गजन्य नसून या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही. विविध प्रकारचे प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डॉक्टर सांगतात.


दरम्यान, सर्व रूग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद