Women’s World Cup 2025 : ठरलं...ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमध्ये २०२५ च्या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी स्पर्धेतील सामना ५ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये होणार आहे. ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने महिला विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे.


२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना २९ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये आणि दुसरा उपांत्य सामना हा ३० ऑक्टोबरला बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. तर २ नोव्हेंबरला होणाऱा अंतिम फेरीचा सामना बंगळुरु अथवा कोलंबो होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला तर हा सामना कोलंबोत खेळवण्यात येईल. अन्यथा विश्वचषकाचा अंतिम सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होईल.



वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक



  • भारत विरुद्ध श्रीलंका- ३० सप्टेंबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध पाकिस्तान- ५ ऑक्टोबर, कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १२ ऑक्टोबर विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध इंग्लंड- १९ ऑक्टोबर, इंदूर - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- २३ ऑक्टोबर, गुवाहाटी - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध बांगलादेश- २६ ऑक्टोबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता


भारतात पाकिस्तानचा सामना नाही..


भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अलीकडेच 'ऑपरेशन सिंदूर' राबवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याच कारणास्तव, भारताने पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर खेळण्याची परवानगी दिली नाही.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ