Women’s World Cup 2025 : ठरलं...ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमध्ये २०२५ च्या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी स्पर्धेतील सामना ५ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये होणार आहे. ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने महिला विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे.


२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना २९ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये आणि दुसरा उपांत्य सामना हा ३० ऑक्टोबरला बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. तर २ नोव्हेंबरला होणाऱा अंतिम फेरीचा सामना बंगळुरु अथवा कोलंबो होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला तर हा सामना कोलंबोत खेळवण्यात येईल. अन्यथा विश्वचषकाचा अंतिम सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होईल.



वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक



  • भारत विरुद्ध श्रीलंका- ३० सप्टेंबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध पाकिस्तान- ५ ऑक्टोबर, कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १२ ऑक्टोबर विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध इंग्लंड- १९ ऑक्टोबर, इंदूर - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- २३ ऑक्टोबर, गुवाहाटी - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध बांगलादेश- २६ ऑक्टोबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता


भारतात पाकिस्तानचा सामना नाही..


भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अलीकडेच 'ऑपरेशन सिंदूर' राबवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याच कारणास्तव, भारताने पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर खेळण्याची परवानगी दिली नाही.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)