Women’s World Cup 2025 : ठरलं...ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

  46

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमध्ये २०२५ च्या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी स्पर्धेतील सामना ५ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये होणार आहे. ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने महिला विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे.


२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना २९ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये आणि दुसरा उपांत्य सामना हा ३० ऑक्टोबरला बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. तर २ नोव्हेंबरला होणाऱा अंतिम फेरीचा सामना बंगळुरु अथवा कोलंबो होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला तर हा सामना कोलंबोत खेळवण्यात येईल. अन्यथा विश्वचषकाचा अंतिम सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होईल.



वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक



  • भारत विरुद्ध श्रीलंका- ३० सप्टेंबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध पाकिस्तान- ५ ऑक्टोबर, कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १२ ऑक्टोबर विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध इंग्लंड- १९ ऑक्टोबर, इंदूर - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- २३ ऑक्टोबर, गुवाहाटी - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध बांगलादेश- २६ ऑक्टोबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता


भारतात पाकिस्तानचा सामना नाही..


भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अलीकडेच 'ऑपरेशन सिंदूर' राबवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याच कारणास्तव, भारताने पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर खेळण्याची परवानगी दिली नाही.

Comments
Add Comment

plane crash: कोणत्या देशात होतात सर्वाधिक विमान अपघात, आकडा पाहून व्हाल हैराण

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्यांनाच हादरवून टाकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व

Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

जबलपूर: मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका बाळंतीणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या

उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

अमरोहा : उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ५ महिलांचा मृत्यू झाला

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आदी १६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

गलवानची ५ वर्षे : संघर्ष, संधी आणि संयमाचा प्रवास

गलवान खोऱ्यातील पाच वर्षे : भारत-चीन सीमा संघर्ष ते शांतता १५ जून २०२०... जी तारीख भारत-चीनदरम्यान झालेल्या भीषण

तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय-३१५ माघारी परतले आहे. विमानाच्या वैमानिकाला