कुंडमळा नंतर पुण्यातील आणखीन एक पूल वाहून गेला

पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथील तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला


पुणे: पुण्याच्या मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि लोखंडी होता, हा पूल कोसळल्यानंतर त्यावर असलेले अनेकजण इंद्रायणी नदीच्या पात्रात वाहून गेले. यातील ५१ जणांना वाचवण्यात यश आले, मात्र यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर तीन ते चारजण बेपत्ता असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी कालपासून एनडीएआरएफ आणि अन्य पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. ही घटना ताजी असताना आणखी एक पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.


पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथे नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पुलाच्या उद्घाटनापूर्वी या तात्पुरत्या पुलाचा वापर केला जात होता. हाच पूल आता वाहून गेल्याचे समोर आले आहे.  पिंरगुट येथील तात्पुरता पूल वाहून जाण्याची घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच पुलाच्या उद्घाटनाचा समारंभ संपन्न झाला होता. त्यामुळे तात्पुरत्या पुलाऐवजी नव्या पुलाचा वापर सुरु करण्यात आला आहे. नवीन पूल सुरु झाल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात