कुंडमळा नंतर पुण्यातील आणखीन एक पूल वाहून गेला

पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथील तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला


पुणे: पुण्याच्या मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि लोखंडी होता, हा पूल कोसळल्यानंतर त्यावर असलेले अनेकजण इंद्रायणी नदीच्या पात्रात वाहून गेले. यातील ५१ जणांना वाचवण्यात यश आले, मात्र यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर तीन ते चारजण बेपत्ता असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी कालपासून एनडीएआरएफ आणि अन्य पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. ही घटना ताजी असताना आणखी एक पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.


पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट येथे नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पुलाच्या उद्घाटनापूर्वी या तात्पुरत्या पुलाचा वापर केला जात होता. हाच पूल आता वाहून गेल्याचे समोर आले आहे.  पिंरगुट येथील तात्पुरता पूल वाहून जाण्याची घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच पुलाच्या उद्घाटनाचा समारंभ संपन्न झाला होता. त्यामुळे तात्पुरत्या पुलाऐवजी नव्या पुलाचा वापर सुरु करण्यात आला आहे. नवीन पूल सुरु झाल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.
Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक