Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

जबलपूर: मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका बाळंतीणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने शनिवारी सरकारी रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला मात्र, दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संजय मिश्रा यांनी दिली.


डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, सदर महिला मंडला जिल्ह्यातील रहिवासी होती आणि तिला आधीच फुफ्फुसाचा आजार होता. संबंधित महिला प्रसूतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आली होती. तिने शनिवारी बाळाला जन्म दिला. यानंतर तिच्या फुफ्फुसात त्रास सुरू झाला. यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदन झाले.


यानंतर, महिलेला आयसोलेशन वार्डात शिफ्ट करण्यात आले. तेथेच तिचा मृत्यू झाला. याशिवाय, रुग्णालयात आणखी एका ७० वर्षीय वृद्धावर कोरोनाचा उपचार सुरू आहे. गेल्या एका आठवड्यात जबलपूरमध्ये ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या