दररोज करा दालचिनीचे सेवन, हे आजार राहतील दूर

मुंबई: दालचिनीला इंग्रजीत सिनॅमन असे म्हणतात. अनेक लोक दालचिनीचा वापर मसाल्यांमध्ये करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दालचिनीमध्ये मँगनीज, व्हिटामिन के, आर्यन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय यात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि अनेक बी व्हिटामिन्स असतात.


यामुळे पचनसंस्थेत सुधारणा येते. तसेच दालचिनीमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते. ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. सूज कमी होण्यास मदत होते.


दालचिनीमध्ये सूज रोखण्याचे गुण असतात यामुळे शरीराचे अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. तसेच पेशींना बळ देण्याचे कामही होते.


दालचिनीमध्ये पॉलिफेनॉलसह अनेक अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीराला मुक्त कणांपासून होणाऱ्या ऑक्सिडेटिव्हपासून बचाव करतात.


रिसर्चनुसार, दालचिनीच्या १.५ ग्रॅमचे दररोज सेवन केल्यास मेटाबॉलिक डिसीज जसे ट्रायग्लिसराईड, टोटल कोलेस्ट्रॉल, खराब कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचा स्तर कमी होण्यास मदत मिळते.


दालचिनीचे सेवन केल्यास हृदयरोगाची जोखीम कमी होण्यास मदत होते. दालचिनीचे सेवन तुम्ही कसेही करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी उकळून प्यायल्याने फायदा होते. यासाठी तुम्ही दालचिनीचा तुकडा अथवा त्याची पावडर पाण्यात उकळून चहाप्रमाणे पिऊ शकता.


Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका