मुंबईत नारळाचे दर कडाडले

मुंबई : कोरोनानंतर शहाळ्यांचा खप ३५ ते ४० टक्क्यांनी वाढला, दुसरीकडे नारळाची निर्यातदेखील वाढल्याने आवक घटली. परिणामी, मुंबईत चातुर्मासाआधीच एका नारळाची किंमत ३५ ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चातुर्मासात हे दर ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.


चातुर्मासात आणि सणासुदीत मध्यम आकाराचा नारळ ६५ ते ७२ रुपयांपर्यंत विक्री होईल, अशी भीती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तामिळनाडूत घाऊक व्यापाऱ्यांना नारळ किलोवर खरेदी करावा लागतो. तर एपीएमसीत नगावर विक्री करतात. सध्या तामिळनाडूत ६८ ते ७० रुपये किलो दराने नारळाची विक्री होते. तेच नारळ आषाढीपर्यंत ८० ते ८५ रुपये किलोपर्यंत विक्री होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.


नारळ उत्पादनात ३५ ते ३० टक्के नारळ शहाळ्यांसाठी वापरले जात असून, २० ते २५ टक्के नारळाची परदेशात निर्यात होते. उर्वरित ४० टक्के नारळ महाराष्ट्रसह इतर राज्यात विक्रीसाठी पाठवले जातात. घाऊक व्यापाऱ्यांकडून नारळाची मागणी वाढली तरी आवक घटल्याने दरवाढ सुरू झाली.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल