मुंबईत नारळाचे दर कडाडले

  47

मुंबई : कोरोनानंतर शहाळ्यांचा खप ३५ ते ४० टक्क्यांनी वाढला, दुसरीकडे नारळाची निर्यातदेखील वाढल्याने आवक घटली. परिणामी, मुंबईत चातुर्मासाआधीच एका नारळाची किंमत ३५ ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चातुर्मासात हे दर ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.


चातुर्मासात आणि सणासुदीत मध्यम आकाराचा नारळ ६५ ते ७२ रुपयांपर्यंत विक्री होईल, अशी भीती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तामिळनाडूत घाऊक व्यापाऱ्यांना नारळ किलोवर खरेदी करावा लागतो. तर एपीएमसीत नगावर विक्री करतात. सध्या तामिळनाडूत ६८ ते ७० रुपये किलो दराने नारळाची विक्री होते. तेच नारळ आषाढीपर्यंत ८० ते ८५ रुपये किलोपर्यंत विक्री होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.


नारळ उत्पादनात ३५ ते ३० टक्के नारळ शहाळ्यांसाठी वापरले जात असून, २० ते २५ टक्के नारळाची परदेशात निर्यात होते. उर्वरित ४० टक्के नारळ महाराष्ट्रसह इतर राज्यात विक्रीसाठी पाठवले जातात. घाऊक व्यापाऱ्यांकडून नारळाची मागणी वाढली तरी आवक घटल्याने दरवाढ सुरू झाली.

Comments
Add Comment

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईसह कोकणात धुमाकूळ! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत मुंबई: उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला एअर इंडिया विमानाच्या प्रवासाचा अनुभव

मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला.या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त

BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली अन्…

मुंबई : मुंबईमधून गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ

मेट्रो ९ चा दहिसर, काशिगाव पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सेवेत

मुंबई : दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यानच्या मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण टप्पा

मनपा कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने विजेची बचत करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येत असून

बोरिवली ते ठाणे भुयारी रस्ता प्रकल्प पुनर्वसनाला गती

एमएमआरडीएकडून तीन पर्यायांची घोषणा मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे