मुंबईत नारळाचे दर कडाडले

मुंबई : कोरोनानंतर शहाळ्यांचा खप ३५ ते ४० टक्क्यांनी वाढला, दुसरीकडे नारळाची निर्यातदेखील वाढल्याने आवक घटली. परिणामी, मुंबईत चातुर्मासाआधीच एका नारळाची किंमत ३५ ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चातुर्मासात हे दर ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.


चातुर्मासात आणि सणासुदीत मध्यम आकाराचा नारळ ६५ ते ७२ रुपयांपर्यंत विक्री होईल, अशी भीती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तामिळनाडूत घाऊक व्यापाऱ्यांना नारळ किलोवर खरेदी करावा लागतो. तर एपीएमसीत नगावर विक्री करतात. सध्या तामिळनाडूत ६८ ते ७० रुपये किलो दराने नारळाची विक्री होते. तेच नारळ आषाढीपर्यंत ८० ते ८५ रुपये किलोपर्यंत विक्री होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.


नारळ उत्पादनात ३५ ते ३० टक्के नारळ शहाळ्यांसाठी वापरले जात असून, २० ते २५ टक्के नारळाची परदेशात निर्यात होते. उर्वरित ४० टक्के नारळ महाराष्ट्रसह इतर राज्यात विक्रीसाठी पाठवले जातात. घाऊक व्यापाऱ्यांकडून नारळाची मागणी वाढली तरी आवक घटल्याने दरवाढ सुरू झाली.

Comments
Add Comment

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता

मुख्याध्यापक, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज ‘शाळा बंद’

एक दिवसाचे वेतन कापण्याचा संचालनालयाचा इशारा मुंबई : शिक्षकांचे समायोजन, टीईटी सक्ती, ऑनलाईन व अशैक्षणिक

कूपर रुग्णालयाची रुग्णसुरक्षा रामभरोसेच!

कधी रुग्णांना उंदरांचा चावा, तर कधी रुग्ण खाटेवरून पडतात मुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयात रुग्णांना कधी

देवेंद्र फडणवीस ३.० ची यशोगाथा

महाराष्ट्रासाठी ‘गोल्डन इयर’ सुहास शेलार मुंबई : ५ डिसेंबर २०२४ चा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. हजारो

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान