अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला एअर इंडिया विमानाच्या प्रवासाचा अनुभव

मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला.या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाच्या विमान अपघात घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने विमानाने प्रवास केला आहे. यावेळी रवीना टंडन हिने अपघातानंतर एअर इंडिया विमानात काय परिस्थिती होती याचा अनुभव शेअर केला आहे.


अभिनेत्री रविना टंडन आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, "नवीन सुरुवात.. परिस्थिती विरोधात असताना पुन्हा उडण्याचं आणि मोठं व्हायचं... पुन्हा नवीन सुरुवात करायची. अधिक सक्षम होण्यासाठी नवीन संकल्प करायचे. वातावरण गंभीर होते आणि क्रू मेंबर्स दु:खाची लकेर असलेल्या हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत होते. शांत प्रवासी आणि क्रू यांच्यातील अव्यक्त शोकभावना. पण तरीही त्यांच्यातील आत्मविश्वासाने ते जोडले आहेत. ज्यांनी प्रियजन गमावलेले त्या सगळ्या कुटुंबीयांप्रती शोकभावना आहेत. ही जखम कधीच भरुन न निघणारी आहे. एअर इंडिया निर्भय(घाबरत नाही) आहे. त्यामुळे यातूनही आणखी खंबीरपणाने उभी राहील. जय हिंद".


दरम्यान, अहमदाबाद येथून उड्डाण घेताच १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातात विमानातील एकूण २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ एक प्रवासी दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून बचावला आहे. तर हॉस्टेलमधील काही निवासी डॉक्टर आणि आसपासच्या परिसरातील काहींचा यात मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध