अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरव

मुंबई : मराठीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळख प्राप्त करणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यांना अमेरिकेतील मराठी बांधवांच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात आला आहे.याबद्दल स्वत: अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.


अभिनेते प्रशांत दामले यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, अजून एक आनंदाचा क्षण… "हे विश्वची माझे घर …" नाटकानी मला काय दिलं? असं विचारलं तर, जगभरांत माझ्यावर प्रेम करणारी मराठी माणसं दिली … काल अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमांत मला "हृदय सम्राट…" हा किताब देउन अनेक वर्षं अमेरिकेत राहूनही आपलं मराठीपण जपलेल्या प्रेक्षकांनी मला गौरवित केलं… हे सगळं केवळ आणि केवळ "नाटकामुळेच…" आणि तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे … कायम ऋणी राहीन !!! असं म्हणत दामले यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


प्रशांत दामले यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी मुंबई शहरात झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम दामले आहे. त्यांचे लग्न गौरी दामले यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुली आहेत. मुंबईत लहानाचे मोठे झाले असलेले प्रशांत दामले यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांना लोकांना सतत हसवायला खूप आवडते आणि ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून हे काम उत्तमपणे पार पाडत आहेत. प्रशांत दामले यांना 'टूर टूर' या सुप्रसिद्ध मराठी नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. हे त्यांच्यासाठी एक मोठे यश ठरले आणि अशा प्रकारे त्यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर प्रवेश केला होता.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा