गलवानची ५ वर्षे : संघर्ष, संधी आणि संयमाचा प्रवास

गलवान खोऱ्यातील पाच वर्षे : भारत-चीन सीमा संघर्ष ते शांतता


१५ जून २०२०... जी तारीख भारत-चीनदरम्यान झालेल्या भीषण संघर्षाची आठवण करून देते. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन दरम्यान ४५ वर्षांतील सर्वात मोठा संघर्ष झाला. यात २० भारतीय जवान शहीद झाले. तर काही चिनी सैनिकही ठार झाले. या घटनेमुळे भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले. या घटनेला आता ५ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या पाच वर्षांत भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून सुरू झालेला संघर्ष हळूहळू निवळताना दिसतोय. तेव्हा आज आपण पाहणार आहोत, गलवानमधील त्या भयंकर रात्रीपासून ते संयम आणि शांततेपर्यंतचा प्रवास.


?si=1EIaP5h5pk3e8K5a

भारत - चीन सीमावाद हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला. नेहमी आगळीक काढणाऱ्या चीनने २०२० च्या मे महिन्यात सैनिकांना तिबेट पठारावर सरावासाठी पाठवले खरे, मात्र वास्तविक हे आहे की सैनिक त्यांनी भारत - चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे अर्थात एलएसीकडे वळवले. पँगॉन्ग त्सो, गलवान खोरे, डोकलाम, तवांग, नथुला, डेप्सांग यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर चिनी सैन्याने अडथळे निर्माण केले. २२ मे रोजी कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी गलवान नदीवर तात्पुरता पूल बांधण्याचा प्रयत्न केला. यावर चीनने आक्षेप घेतला. ६ जून रोजी दोन्ही बाजूंनी माघार घेतली गेली, मात्र कुरापतीखोर चीनने आपलं बांधकाम कायम ठेवत भारतीय पूल तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात चकमक झाली. या चकमकीत कर्नल संतोष बाबूसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ५ सैनिक ठार झाले. तर एका अहवालानुसार ३५-४० चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा आहे.



गलवानमधल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढला. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ५०-६० हजार सैनिक तैनात केले, मात्र त्याचवेळी दुसरीकडे शांततेच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली. आतापर्यंत २१ कॉर्प्स कमांडर पातळीवरील बैठका झाल्या. जुलै २०२० मध्ये गलवान, फेब्रुवारी २०२१ मध्ये पँगॉन्ग त्सोचा उत्तर आणि दक्षिण भाग तर ऑगस्ट २०२१ मध्ये गोग्रा-हॉट स्प्रिंग्ज आणि सप्टेंबर २०२२ मध्ये पेट्रोलिंग पॉईंटमधून सैन्य माघारी घेण्यात आलं. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी डेप्सांग आणि डेमचोकमध्येही सैन्य माघारी घेण्यात आलं. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्थात चार वर्षांहून अधिक काळानंतर भारत आणि चिनी सैनिकांनी डेप्सांग आणि डेमचोकमध्ये गस्त सुरू केली. दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी मिठाईची देवाणघेवाण करत शांततेचा संदेश दिला.


सीमावाद सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवरही प्रयत्न झाले. ३१ बैठका आणि अनेक उच्चस्तरीय चर्चांनंतर, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्तीबाबत करार झाल्याची घोषणा केली. २३ ऑक्टोबरला ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भेट घेऊन शांतता आणि परस्परांवरी विश्वासावर भर दिला. त्यानंतर ७५ टक्के सीमावाद संघर्ष संपल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.


भारताने सैनिकी सामर्थ्य दाखवतानाच २ लाख सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केले. तसंच ११८ चिनी ॲप्सवर बंदी घातली. आर्थिक निर्बंध लादून भारतानं चीनविरोधात कठोर भूमिका घेतली. गलवान खोऱ्यातील बलिदानापासून ते शांततेच्या नव्या पर्वापर्यंत, भारताने आपली संरक्षण क्षमता आणि कूटनीतीचा योग्य प्रकारे वापर केलाय. याचा फायदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी झाला. सैन्य माघारीची प्रक्रिया झाली असली तरी भारतासमोर अनेक नवीन आव्हानं आहेत. चीन पुन्हा कधी सीमेवर गडबड करेल, सांगता येत नाही. त्यामुळे भारताला सदैव सतर्क राहावे लागेल.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई

गंभीर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णय कर्नाटक : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करुन अनेक निरपराध

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक