घरी कुणाची आजारी आई, तर कुणाचे लहान बाळ... तरी २४ तास लॅबमध्येच! फॉरेन्सिक तज्ञांची कर्तव्यदक्षता पणाला

विमान अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे समर्पण


अहमदाबाद: विमान अपघाताची चौकशी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून केली जात आहे.  विमान अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासाठी फॉरेन्सिक टीमने दिवसरात्र एकत्र केली आहे. ३६ लोकांच्या या टीमने गेले दोन दिवस लॅबमध्ये अक्षरशः स्वतःला वाहून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांची ओळख पटण्यासाठी नातेवाईकांचा डीएनए घेतला जात आहे. ही प्रक्रिया देखील इतकी क्लिष्ट आहे की, यामध्ये थोडासाही विलंब झाला तर पुरावा नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे फॉरेन्सिक तज्ञांची कर्तव्यदक्षता आता पणाला लागली आहे. (Dedication of FSL Forensic Experts)


गुरुवारी झालेल्या विमान आपघातानंतर, दुसऱ्या दिवशी घटनास्थळाहून आतापर्यंत एकूण २७० जणांचे मृतदेह आढळून आले. ज्यामध्ये विमानाचे प्रवासी तर आहेच त्यासोबत विमान जिथे कोसळले त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचादेखील समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात मृत पावलेल्या लोकांची ओळख पटवणे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हानच बनले आहे.  उच्च तापमानामुळे पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे, ज्यामुळे वेगाने काम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आतापर्यंत २५० हून अधिक मृतांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्यात आले असून, मृतदेहासोबत त्यांचे डीएनए टेस्ट केले जात आहेत. येत्या काही दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीममधला प्रत्येकजण सचोटीने आपले कार्य करत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे  कौतुक केले जात आहे. या संदर्भात सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फॉरेन्सिक टीममधील काही लोकांच्या समर्पणाची माहिती शेअर केली आहे.






या पोस्टद्वारे एफएसएल फॉरेन्सिक तज्ञांच्या समर्पणाचे कौतुक केले आहे. यात असे म्हंटले आहे की, "३६ समर्पित फॉरेन्सिक तज्ञांच्या टीमने केलेले त्यांचे वैयक्तिक बलिदान खरोखरच उल्लेखनीय आहे. असेच एक उदाहरण म्हणजे एका फॉरेन्सिक तज्ञाची आई ज्याची आई सध्या तिच्या आयुष्याची झुंज देत आहे, तिचे हृदय पूर्णतः निकामी झाले असून, फक्त २०% हृदय कार्यरत आहे, तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. असे  असूनही, ही तज्ञ डीएनए चाचणी प्रयत्नांसाठी वचनबद्ध आहे. शिवाय, टीममधील ८ महिला तज्ञ आहेत जी ३ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या माता आहेत. त्यांच्या लहान मुलांची काळजी घेण्याच्या आव्हानांना न जुमानता, त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची निस्वार्थीपणा आणि कर्तव्याप्रती समर्पण त्यांच्या व्यावसायिकता आणि करुणेचा पुरावा आहे. आम्ही या अज्ञात नायकांना सलाम करतो जे त्यांच्या वैयक्तिक संघर्षांना न जुमानता, या दुर्घटनेने प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी दिवसरात्र अथक परिश्रम करत आहेत.


आपल्या व्यक्तिगत अडचणी बाजुला ठेवून फॉरेन्सिक टीममधील तज्ञा  विमान आपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या समस्या आणि वेदना सोडवण्यात व्यस्त आहे.  माणुसकी आणि कर्तव्याला जागणाऱ्या या फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचे समर्पण किती मोठे आहे, हे यामधून समजते.

Comments
Add Comment

फुटबॉल, फॅसिझम आणि वाद : विश्वचषकाचा रंजक इतिहास!

फुटबॉल हा केवळ एक खेळ नाही; तो जगभरातील अब्जावधी लोकांच्या भावना, राष्ट्रीय अस्मिता आणि संस्कृतीचा महोत्सव आहे.

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट जेलची हवा! कठोर कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा ते गाताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि