‘हल्ले थांबवा नाही तर तेहरानला आग लावू’

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इराणच्या खोमेनींना इशारा


नवी दिल्ली : १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा आणि लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यात अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि वैज्ञानिक मारले गेले. त्यानंतर खवळलेल्या इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स सोडले. यामुळे इस्रायलमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना इशारा दिला आहे. इराणने हल्ले थांबवावेत नाही तर तेहरानला आग लावू, असा धमकी वजा इशारा कात्झ यांनी दिला आहे.



इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पेटला आहे. इस्रायलने हल्ले केल्यानंतर इराणने मिसाईल्स आणि ड्रोन्स इस्रायलवर डागले. तेल अवीव इतर काही शहरात मिसाईलमुळे नुकसान झाले आहे. इराणकडून हल्ले सुरूच असून, इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणला इशारा दिला आहे.


इराणसोबतचा लष्करी संघर्ष वाढल्यानंतर इस्रायलमध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला आयडीएफ (इस्रायल डिफेन्स फोर्सेस)चे चीफ ऑफ स्टाफ एयार जामीर, मोसादचे प्रमुख डेव्हिड बारनेआ आणि इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री कात्झ म्हणाले, इराणचा हुकूमशाह स्वतःच्याच नागरिकांना ओलीस ठेवू लागला आहे आणि अशी परिस्थिती तयार करत आहे. ज्यात विशेषतः तेहरानच्या नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागेल. कात्झ यांनी अयातुल्ला खोमेनी यांना धमकी वजा इशारा देत म्हटले की, जर खोमेनी इस्रायलच्या नागरिकांवर मिसाईल्स डागत राहिले, तर आम्ही तेहरानला आग लावू. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, मागील रात्रीपासून आतापर्यंत इराणने इस्रायलवर तब्बल २०० बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. यात बहुतांश मिसाईल्स इस्रायलच्या एअर डिफेन्सने हवेतच नष्ट केल्या. पण, अंदाजानुसार २५ टक्के मिसाईल्स इंटरसेप्ट झाल्या नाही. त्या पाडण्यात अपयश आले आणि काही मोकळ्या जागेत पडल्या. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, इराणच्या काही मिसाईल्स चकमा देऊन इस्रायलमधील नागरी भागात कोसळल्या. तेल अवीव, रमात गन आणि रिशोल लेजिओने या शहरात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.


इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्त्रायलची हानी

इराणच्या २५ टक्के मिसाईल पाडण्यात इस्त्रायल अपयशी
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच