‘हल्ले थांबवा नाही तर तेहरानला आग लावू’

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इराणच्या खोमेनींना इशारा


नवी दिल्ली : १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा आणि लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यात अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि वैज्ञानिक मारले गेले. त्यानंतर खवळलेल्या इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स सोडले. यामुळे इस्रायलमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना इशारा दिला आहे. इराणने हल्ले थांबवावेत नाही तर तेहरानला आग लावू, असा धमकी वजा इशारा कात्झ यांनी दिला आहे.



इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पेटला आहे. इस्रायलने हल्ले केल्यानंतर इराणने मिसाईल्स आणि ड्रोन्स इस्रायलवर डागले. तेल अवीव इतर काही शहरात मिसाईलमुळे नुकसान झाले आहे. इराणकडून हल्ले सुरूच असून, इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी इराणला इशारा दिला आहे.


इराणसोबतचा लष्करी संघर्ष वाढल्यानंतर इस्रायलमध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला आयडीएफ (इस्रायल डिफेन्स फोर्सेस)चे चीफ ऑफ स्टाफ एयार जामीर, मोसादचे प्रमुख डेव्हिड बारनेआ आणि इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री कात्झ म्हणाले, इराणचा हुकूमशाह स्वतःच्याच नागरिकांना ओलीस ठेवू लागला आहे आणि अशी परिस्थिती तयार करत आहे. ज्यात विशेषतः तेहरानच्या नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागेल. कात्झ यांनी अयातुल्ला खोमेनी यांना धमकी वजा इशारा देत म्हटले की, जर खोमेनी इस्रायलच्या नागरिकांवर मिसाईल्स डागत राहिले, तर आम्ही तेहरानला आग लावू. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, मागील रात्रीपासून आतापर्यंत इराणने इस्रायलवर तब्बल २०० बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. यात बहुतांश मिसाईल्स इस्रायलच्या एअर डिफेन्सने हवेतच नष्ट केल्या. पण, अंदाजानुसार २५ टक्के मिसाईल्स इंटरसेप्ट झाल्या नाही. त्या पाडण्यात अपयश आले आणि काही मोकळ्या जागेत पडल्या. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, इराणच्या काही मिसाईल्स चकमा देऊन इस्रायलमधील नागरी भागात कोसळल्या. तेल अवीव, रमात गन आणि रिशोल लेजिओने या शहरात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.


इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्त्रायलची हानी

इराणच्या २५ टक्के मिसाईल पाडण्यात इस्त्रायल अपयशी
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव