मणिपूरमध्ये ३२८ बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

  59

इम्फाल : मणिपूर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी मणिपूरच्या इंम्फाल खोऱ्यातील 5 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. यामध्ये 328 स्वयंचलीत बंदुकांसह मोठ्या प्रमाणात हँडग्रेनेड आणि दारूगोळ्याचा समावेश असल्याची माहिती माहिती अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षणक लहरी दोरजी लहटू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुरक्षा दलांनी 13 व 14 जूनच्या मध्यरात्री इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांत ही धडक कारवाई करत स्फोटके आणि इतर शस्त्रसामग्री जप्त केली. यामध्ये 151 एसएलआर रायफल्स, 65 इन्सास रायफल्स, इतर प्रकारच्या 73 रायफल्स, 5 कार्बाइन गन, 2 एमपी-5 गन अशा एकूण 328 स्वयंचलीत बंदुकी आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्‍या आधारे मणिपूर पोलीस आणि सुरक्षा दलांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई केली आहे, असेही लहटू यांनी स्‍पष्‍ट केले.

भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने स्पीअर कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली, 26 मे ते 5 जून दरम्यान मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने कांगपोक्पी, थौबल, काकचिंग, तेंग्नौपाल, बिष्णुपूर, जिरीबाम, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम या डोंगरी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये गुप्तचर यंत्रणांवर आधारित ऑपरेशन्स सुरू केल्या, असे एका निवेदनात म्‍हटले आहे. या ऑपरेशन्समध्ये 23 फुटीरवाद्यांना अटक करण्‍यात आली आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )