मणिपूरमध्ये ३२८ बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

इम्फाल : मणिपूर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी मणिपूरच्या इंम्फाल खोऱ्यातील 5 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. यामध्ये 328 स्वयंचलीत बंदुकांसह मोठ्या प्रमाणात हँडग्रेनेड आणि दारूगोळ्याचा समावेश असल्याची माहिती माहिती अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षणक लहरी दोरजी लहटू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुरक्षा दलांनी 13 व 14 जूनच्या मध्यरात्री इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांत ही धडक कारवाई करत स्फोटके आणि इतर शस्त्रसामग्री जप्त केली. यामध्ये 151 एसएलआर रायफल्स, 65 इन्सास रायफल्स, इतर प्रकारच्या 73 रायफल्स, 5 कार्बाइन गन, 2 एमपी-5 गन अशा एकूण 328 स्वयंचलीत बंदुकी आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्‍या आधारे मणिपूर पोलीस आणि सुरक्षा दलांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई केली आहे, असेही लहटू यांनी स्‍पष्‍ट केले.

भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने स्पीअर कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली, 26 मे ते 5 जून दरम्यान मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने कांगपोक्पी, थौबल, काकचिंग, तेंग्नौपाल, बिष्णुपूर, जिरीबाम, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम या डोंगरी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये गुप्तचर यंत्रणांवर आधारित ऑपरेशन्स सुरू केल्या, असे एका निवेदनात म्‍हटले आहे. या ऑपरेशन्समध्ये 23 फुटीरवाद्यांना अटक करण्‍यात आली आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला