ऐरोली सिलिंडर स्फोटानंतर मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

मुंबई (खास प्रतिनिधी): ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील सिलिंडर स्फोटाच्या दुघर्टनेनंतर दादर, वडाळा रेल्वे स्थानक तसेच फाईव्ह गार्डन परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन देवून खाद्यपदार्थ विक्रीसाठी सिलिंडर सारख्या ज्वलनशील वस्तू तथा पदार्थ जप्त करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.



अमेय घोले यांनी महापालिकेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात एका बेकायदेशीर फेरीवाल्याच्या दुकानात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे गंभीर अपघात घडला. अशा बेकायदेशीर फेरीवाल्यांकडे कोणतीही अधिकृत परवानगी आणि सुरक्षिततेची हमी किंवा नियंत्रण नसल्याने अशा घटनांनी नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. अशाप्रकारे चिंता व्यक्त करतानाच त्यांनी दुर्दैवाने, एफ उत्तर विभागातील दादर रेल्वे स्थानक, वडाळा रेल्वे स्थानक व फाईव्ह गार्डन परिसरातही अशा प्रकारचे बेकायदेशीर फेरीवाले मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडेही अशा प्रकारचे गॅस सिलिंडर, स्टोव्ह, इतर ज्वलनशील वस्तू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे अतिक्रमण केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाहीत, तर भविष्यात ऐरोलीसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण करते.

त्यामुळे या सर्व ठिकाणांवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांची तपासणी करून त्वरित कारवाई करावी. तसेच जे फेरीवाले गॅस सिलिंडर, स्टोव्ह, किंवा तत्सम साहित्य वापरत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
Comments
Add Comment

मेट्रो ३ मार्गिकेचा लोकार्पण सोहळा: मुंबईकरांना मिळणार जलद आणि सोयीस्कर प्रवास

मुंबई :  मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्वाचा बदल घडणार आहे. आता, आरे रोड ते कफ परेड दरम्यान

अक्षय कुमारमुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशात बदल होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की या संस्थेसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय

व्हॉट्अ‍ॅपवर नंबर नाही; आता दिसेल ‘युजरनेम’

मुंबई (प्रतिनिधी) : प्रायव्हसीची (गोपनीयतेची) काळजी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. लवकरच व्हॉट्अ‍ॅप

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

तळोजा एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे

मुंबई ते नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार जलद

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वात मोठी २ विनातळे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत