क्रिकेटच्या नव्या नियमानुसार 'बन्नी हॉप कॅच' अवैध ठरणार

लॉर्ड्स : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सर्व नवे नियम कसोटी क्रिकेटमध्ये १७ जूनपासून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ जुलैपासून आणि T20 क्रिकेटमध्ये १० जुलैपासून लागू होणार आहेत. नव्या नियमांपैकी एका नियमानुसार 'बन्नी हॉप कॅच' अवैध ठरणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात २५ षटकांनंतर चेंडू बदलला जातो. नव्या नियमानुसार पहिल्या ३४ षटकांमध्ये दोन चेंडू वापरता येतील. नंतर ३५ ते ५० व्या षटकादरम्यान वापरलेल्या या दोन चेंडूंपैकी एक चेंडू वापरावा लागेल. जर सामना २५ षटकांपुरता मर्यादीत झाला तर एकच चेंडू वापरता येईल.

नाणेफेक होण्याआधी प्रत्येक संघाला पाच कन्कशन सब्सटीट्युट्स – एक फलंदाज, एक यष्टीरक्षक, एक गोलंदाज, एक फिरकीपटू, एक अष्टपैलू – यांची यादी सामनाधिकारी यांच्याकडे द्यावी लागेल. खेळाडूला दुखापत झाल्यास या यादीतून बदली खेळाडू घेण्याचे बंधन असेल. फलंदाजाच्या बदल्यात फलंदाज, गोलंदाजाच्या बदल्यात गोलंदाज, फिरकीपटूच्या बदल्यात फिरकीपटू, अष्टपैलूच्या बदल्यात अष्टपैलू, यष्टीरक्षकाच्या बदल्यात यष्टीरक्षक घेण्याचे बंधन असेल.

सीमारेषेबाहेर म्हणजेच बाउंडरी लाईनच्या बाहेर “बन्नी हॉप” करत घेतले जाणारे झेल अमान्य अर्थात अवैध असतील. क्रिकेटमध्ये चुरस वाढवणे, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संतुलन राखणे आणि खेळ आणखी रंगतदार करणे यासाठी हे नियम करण्याचा निर्णय झाला आहे.

बन्नी हॉप म्हणजे काय ?

क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेबाहेर असताना त्याने चेंडू उडवणे आणि नंतर मैदानात येऊन झेलणे या पद्धतीने झेल घेण्याला 'बन्नी हॉप कॅच' म्हणतात. या 'बन्नी हॉप कॅच'ला अवैध ठरवण्यात आले आहे. पण क्षेत्ररक्षकाने मैदानात असताना चेंडू उडवला, नंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर गेला आणि तिथून परत मैदानात आल्यानंतर त्याने चेंडू झेलला तर ते वैध आहे.
Comments
Add Comment

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा