क्रिकेटच्या नव्या नियमानुसार 'बन्नी हॉप कॅच' अवैध ठरणार

  132

लॉर्ड्स : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सर्व नवे नियम कसोटी क्रिकेटमध्ये १७ जूनपासून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ जुलैपासून आणि T20 क्रिकेटमध्ये १० जुलैपासून लागू होणार आहेत. नव्या नियमांपैकी एका नियमानुसार 'बन्नी हॉप कॅच' अवैध ठरणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात २५ षटकांनंतर चेंडू बदलला जातो. नव्या नियमानुसार पहिल्या ३४ षटकांमध्ये दोन चेंडू वापरता येतील. नंतर ३५ ते ५० व्या षटकादरम्यान वापरलेल्या या दोन चेंडूंपैकी एक चेंडू वापरावा लागेल. जर सामना २५ षटकांपुरता मर्यादीत झाला तर एकच चेंडू वापरता येईल.

नाणेफेक होण्याआधी प्रत्येक संघाला पाच कन्कशन सब्सटीट्युट्स – एक फलंदाज, एक यष्टीरक्षक, एक गोलंदाज, एक फिरकीपटू, एक अष्टपैलू – यांची यादी सामनाधिकारी यांच्याकडे द्यावी लागेल. खेळाडूला दुखापत झाल्यास या यादीतून बदली खेळाडू घेण्याचे बंधन असेल. फलंदाजाच्या बदल्यात फलंदाज, गोलंदाजाच्या बदल्यात गोलंदाज, फिरकीपटूच्या बदल्यात फिरकीपटू, अष्टपैलूच्या बदल्यात अष्टपैलू, यष्टीरक्षकाच्या बदल्यात यष्टीरक्षक घेण्याचे बंधन असेल.

सीमारेषेबाहेर म्हणजेच बाउंडरी लाईनच्या बाहेर “बन्नी हॉप” करत घेतले जाणारे झेल अमान्य अर्थात अवैध असतील. क्रिकेटमध्ये चुरस वाढवणे, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संतुलन राखणे आणि खेळ आणखी रंगतदार करणे यासाठी हे नियम करण्याचा निर्णय झाला आहे.

बन्नी हॉप म्हणजे काय ?

क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेबाहेर असताना त्याने चेंडू उडवणे आणि नंतर मैदानात येऊन झेलणे या पद्धतीने झेल घेण्याला 'बन्नी हॉप कॅच' म्हणतात. या 'बन्नी हॉप कॅच'ला अवैध ठरवण्यात आले आहे. पण क्षेत्ररक्षकाने मैदानात असताना चेंडू उडवला, नंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर गेला आणि तिथून परत मैदानात आल्यानंतर त्याने चेंडू झेलला तर ते वैध आहे.
Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये