भाजपा आमदाराच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शिरला शेतकरी अन्...

बुलढाणा : पावसाळी अधिवेशन जवळ येऊ लागताच आंदोलनं करुन राज्य शासनापुढे स्वतःचे प्रश्न मांडण्याला वेग आला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. अमरावतीत काही दिवस बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले. सरकारकडून आश्वासन मिळताच बच्चू कडू यांनी आंदोलन थांबवले. यामुळे शांतता निर्माण होत नाही तोच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शेतकरी शिरला. आमदाराचा बंगला जाळण्याची भाषा करत शेतकरी बंगल्यात दाखल झाला होता.

कुटेंच्या स्वीय सहायकाने शेतकऱ्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३३३, ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.

खरीप हंगामासाठी शेत जमीन तयार केली होती. पण जून ऐवजी मे महिन्यात पाऊस पडला. यामुळे काही महत्त्वाची कामं होण्याआधीच पूर्ण जमीन निसरडी झाली आणि शेतीची आधी केलेली कामं वाया गेली. यामुळे झालेल्या हानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत शेतकरी आमदाराचा बंगला जाळण्यासाठी आला होता.
Comments
Add Comment

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात