भाजपा आमदाराच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शिरला शेतकरी अन्...

बुलढाणा : पावसाळी अधिवेशन जवळ येऊ लागताच आंदोलनं करुन राज्य शासनापुढे स्वतःचे प्रश्न मांडण्याला वेग आला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. अमरावतीत काही दिवस बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले. सरकारकडून आश्वासन मिळताच बच्चू कडू यांनी आंदोलन थांबवले. यामुळे शांतता निर्माण होत नाही तोच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शेतकरी शिरला. आमदाराचा बंगला जाळण्याची भाषा करत शेतकरी बंगल्यात दाखल झाला होता.

कुटेंच्या स्वीय सहायकाने शेतकऱ्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३३३, ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.

खरीप हंगामासाठी शेत जमीन तयार केली होती. पण जून ऐवजी मे महिन्यात पाऊस पडला. यामुळे काही महत्त्वाची कामं होण्याआधीच पूर्ण जमीन निसरडी झाली आणि शेतीची आधी केलेली कामं वाया गेली. यामुळे झालेल्या हानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत शेतकरी आमदाराचा बंगला जाळण्यासाठी आला होता.
Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास