भाजपा आमदाराच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शिरला शेतकरी अन्...

बुलढाणा : पावसाळी अधिवेशन जवळ येऊ लागताच आंदोलनं करुन राज्य शासनापुढे स्वतःचे प्रश्न मांडण्याला वेग आला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. अमरावतीत काही दिवस बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले. सरकारकडून आश्वासन मिळताच बच्चू कडू यांनी आंदोलन थांबवले. यामुळे शांतता निर्माण होत नाही तोच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शेतकरी शिरला. आमदाराचा बंगला जाळण्याची भाषा करत शेतकरी बंगल्यात दाखल झाला होता.

कुटेंच्या स्वीय सहायकाने शेतकऱ्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३३३, ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.

खरीप हंगामासाठी शेत जमीन तयार केली होती. पण जून ऐवजी मे महिन्यात पाऊस पडला. यामुळे काही महत्त्वाची कामं होण्याआधीच पूर्ण जमीन निसरडी झाली आणि शेतीची आधी केलेली कामं वाया गेली. यामुळे झालेल्या हानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत शेतकरी आमदाराचा बंगला जाळण्यासाठी आला होता.
Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री