NEET 2025 निकाल जाहीर; महाराष्ट्रातून १.२५ लाख विद्यार्थी पात्र, कृष्णांग देशात तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : नीट-यूजी २०२५ (NEET-UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत १७ हजारांनी घटली आहे.


या वर्षी राज्यातून २ लाख ४८ हजार २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेला हजेरी लावली. त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.


सर्वोच्च १० गुणवंतांमध्ये महाराष्ट्राच्या कृष्णांग जोशीने देशपातळीवर तिसरा क्रमांक पटकावला आहे, तर आरव अग्रवालने दहावा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय, मुलींच्या टॉप-२० यादीतही महाराष्ट्राच्या विद्यार्थिनींनी आपली चमक दाखवली. सिद्धी बढे (३री), ऊर्जा शहा (५वी) आणि इश्मित कौर (१२वी) यांनी आपले नाव उज्वल केले.



ही परीक्षा यंदा ४ मे रोजी भारतासह परदेशातील ५,४६८ केंद्रांवर पार पडली. अबूधाबी, दुबई, शारजा, दोहा, सिंगापूर यांसारख्या शहरांतील विद्यार्थ्यांसाठीही केंद्रे उपलब्ध होती.


परीक्षा इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतली गेली. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, देशभरातून १२ लाख ३६ हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले असून, याच आधारे त्यांना वैद्यकीय, दंतवैद्यकीय व इतर संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे.


विद्यार्थ्यांना निकाल आणि गुणवत्ता यादी (https://neet.nta.nic.in/) या संकेतस्थळावर पाहता येईल.

Comments
Add Comment

मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावरील अपघात स्थळाला महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी, आमदार मिहिर कोटेचा यांची भेट

उपासनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांचे केले सांत्वन मुंबई : मुलुंड (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अँड

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड,

Mulund Metro Slab Collapse: "दोषींवर कडक कारवाई केली जाईल"; मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेवर महापौर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया

मुलुंड: मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधेरीतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी