हृदयविकाराने नव्हे तर मधमाशी तोंडात गेल्याने झाला संजय कपूर यांचा मृत्यू, कंगणाने केला खुलासा

नवी दिल्ली: बॉलीवूड क्वीन आणि भाजपची खासदार कंगना राणौतने इंस्टाग्रामवर करिश्मा कपूरचे  माजी पती संजय कपूरच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. मात्र तिची पोस्ट केवळ श्रद्धांजली व्यक्त करणारी नव्हे तर, संजय कपूर यांच्या निधनाचे खरे कारण देखील उघड करणारी आहे.  ज्यामध्ये तिने लिहिले - 'आणखी एक अविश्वसनीय घटना घडली आहे. संजय कपूर (करिश्मा कपूरचा माजी पती) पोलो ग्राउंडवर खेळत होते. अचानक त्याच्या तोंडात एक मधमाशी गेली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.'


बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त काल प्रसारमध्यमांत झळकले. त्यानुसार, पोलो ग्राउंडवर संजय यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले. पण त्यांच्या मृत्यूचे कारण श्वासनलिकेत मधमाशी अडकणे आहे. हा कंगना राणौतचा दावा आहे.


कंगना राणौतने इन्स्टाग्रामवर संजय कपूरच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना लिहिलेली ही पोस्ट सर्वांना बुचकळ्यात पाडते आहे. 



कंगणाची पोस्ट व्हायरल


ज्यात तिने म्हंटले आहे की, संजय कपूर (करिश्मा कपूरचा माजी पती) पोलो ग्राउंडवर खेळत होते. अचानक एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली. पोलो ग्राउंडवर एक मधमाशी होती. जी संजय कपूर यांच्या तोंडात गेली आणि तिने संजय यांच्या गळ्याचा चावा घेतला, ज्यामुळे त्यांची श्वासनलिका बंद झाली. ते श्वास घेऊ शकत नव्हते. संजय कपूर यांनी खेळ मध्यभागी थांबवण्याची सूचना केली. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला." अशी सविस्तर माहिती कंगणाने आपल्या पोस्टद्वारे दिली आहे.


ती पुढे अशी देखील म्हणते की अशाप्रकारे मृत्यू येणं ही किती दुःखद बातमी आहे. या प्रकारच्या बातम्या ऐकून मी आता थकले आहे. "२०२५ मध्ये इतक्या विचित्र घटना घडत आहेत. की त्या आपल्या जीवनावर परिणाम करत आहेत. मी प्रार्थना करते की सर्वजण सुरक्षित राहावेत आणि देवाकडे प्रार्थना करत राहावे." असे देखील तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.  करिश्मा कपूरला संजय कपूरपासून दोन मुले आहेत, ज्यांचे नाव समायरा आणि कियान असे आहे, संजय कपूर यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांचे करिश्मा आणि त्यांच्या मुलांसोबतचे जून फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 



अहमदाबाद विमान अपघाताबाबत व्यक्त केला शोक


अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान AI171 च्या अपघातानंतर कंगना राणौतने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला होता. या अपघातात जीव गमावलेल्यांसाठी तिने प्रार्थना केली.

Comments
Add Comment

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

फरहान अख्तर आणि सुखविंदर सिंग लखनऊमध्ये १२० बहादूरच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगसाठी पुन्हा एकत्र येणार!

मुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी युद्ध नाटक, १२० बहादूर, या वर्षातील सर्वात चर्चेत

सतीश शाहांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच पाठवला होता मेसेज : सचिन पिळगावकरने दिली माहिती !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या