
मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा
रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात पडलेल्या धुंवाधार पावसाने जिल्हयातील ग्रामीण भागाला चांगलाच दणका दिला आहे. या मुसळधार पावसामुळे राजापूरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून मध्यरात्री या पुराच्या पाण्याने पिकअप शेड लगतच्या गणेश वडापाव स्टॉल पर्यत धडक मारली होती. तर या वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील आडिवरे येथील प्रसिध्द श्री महाकाली देवी मंदिर परिसरात पाणी शिरले होते. तब्बल ३५ वर्षांनंतर या परिसरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!
रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात ३७ वर्षांनंतर पुराचे पाणी शिरले ...
भालावली, धाऊवल्ली, कशेळी, नवेदर, कोतापूर या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून त्यांचे नुकसान झाले आहे. तर भाटलेवाडी येथील वहाळावरील पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. तर राजवाडी वाडा भराडे येथील रस्त्यावर दरड कोसळली आहे. या पावसात रस्ते, पुल यांची पुरती दुरावस्था झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झ्राले आहे. या पावसामुळे काही भागात वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.
वांद्रीत संरक्षक भिंत कोसळून सोमेश्वर मंदिरात चिखल

मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री भागात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंदिरालगतची संरक्षक भिंत कोसळल्याने दगड आणि चिखलाचा राडारोडा थेट ऐतिहासिक सोमेश्वर मंदिरात घुसला आहे. त्यामुळे भाविकांसाठी मंदिरात प्रवेश करणेही अशक्य झाले आहे.
वांद्री येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी ठेकेदाराने बनवलेला तात्पुरता रस्ता (डायव्हर्जन) नीट नियोजन न केल्यामुळे परिसरात चिखल आणि पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. विशेषतः, मंदिराजवळील नाल्याला अडथळा होऊन पाणी साचल्याने भिंतीवर दाब वाढला. परिणामी, सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसात ती भिंत कोसळून मंदिरात चिखलाचा ढिग साचला.
शनिवारी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात गेलेल्या गुरवांना ही परिस्थिती दिसून आली. मंदिराची अवस्था पाहून गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. यापूर्वी सूचना देऊनही ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गोळप मानेवाडी येथे डोंगर कोसळला; ८ कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना

शुक्रवारी पावस गोळप परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. येथील गोळप माने वाडी येथे डोंगर कोसळला. यात ८ घरातील लोकांना स्थलांतरीत व्हा, असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही मोटारसायकल मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही असे प्रशासनाने कळवले आहे.
तर मध्यरात्री बाजारपेठेत काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी आले होते. अडीवरे आणि परिसरातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक वर्षांनंतर अडीवरे येथील प्रसिद्ध महाकाली देवीच्या आवारात पाणी भरले होते, अनेक मार्गावर सुद्धा पाणी साचलेले दिसून आले.
पावस मध्ये देखिल काही भागात नदीलगतच्या घरात पाणी भरले होते.