वसई-विरार पालिकेत राहतील २९ प्रभाग!

नगरसेवकांची ११५ संख्या कायम


विरार  : पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार आता प्रभागांची रचना करण्यात येणार असून, पालिकेच्या ११५ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र मानिव लोकसंख्येच्या आधारे वाढविलेल्या प्रभाग संख्येनुसार या निवडणुका घ्याव्यात की जुन्या प्रभाग संख्येनुसार यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्णय देण्यात आलेले नव्हते.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभागांची रचना कशा प्रकारे करण्यात यावी यासंदर्भात परिपत्रक काढून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.



वसई-विरार महापालिका 'क' वर्गामध्ये मोडत असल्याने येथील प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून केल्या जाणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला मान्यता गृहीत धरून वसई-विरार शहर महानगरपालिकेने आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत २१ मे २०२२ रोजी काढली व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर १ जून ते ६ जून २०२२ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर १३ मे २०२२ रोजी पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ आरक्षणाची अधिसूचना महापालिकेने प्रसिद्ध केली. या अधिसूचनेत ओबीसीं प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नव्हती. मात्र सदस्य संख्या ११ ने वाढवून १२६ करण्यात आली होती, तर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत ३१ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या त्यापैकी १६ जागा या महिलांसाठी
राखीव होत्या.

ही निवडणूक ११५ सदस्यांसाठी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता ओबीसी जागांचा मुद्दा निवडणुकीसाठी निकाली निघाला आहे. त्याचप्रमाणे आता चार सदस्यांचा एक प्रभाग अशाप्रकारे वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने महापालिकेत बैठकांचे सत्र सुरूझाले आहे.
Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक