एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल


चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.




संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि काय नाही याचा नेम नाही. अलिकडेच पुण्यातील एका प्रसिद्ध नाट्यगृहाचे उंदीर प्रकरण ताजे असताना, आता  छत्रपती संभाजीनगरामधून एक विश्वास न बसणारी बातमी समोर आली आहे. चक्क एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.


एका उंदरामुळे संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 9 तास खंडित झाला होता. त्यामुळे पाणी न मिळाल्याने गुरूवारी रहिवाशांचे मोठे हाल झाले. जायकवाडी धरणातील नवीन पारोळा पंपगृह येथील पंपगृहात उंदीर शिरल्यामुळे दोन्ही फेस एकत्र होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा तब्बल 9 तास बंद होता. परिणामी अनेक भागात आज पाणी मिळू शकले नाही. शनिवारी देखील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


नवीन फारोळा पंपगृह येथील इन्कमर 2 मध्ये स्पार्क होऊन पहाटे 4:25 वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यानंतर सर्व इन्कमर पॅनलची तपासणी केली असता इन्कमर 2 मध्ये उंदीर शिरल्यामुळे फेस टू फेस होऊन पंपिंग ट्रिप झाली झाल्याचे आढळून आले. उंदीर पॅनल बाहेर काढून ट्रायल घेते वेळेस सबस्टेशन मधील सप्लाय स्टँड होत नसल्याने ट्रान्सफॉर्मर चेकिंग काम करण्यासाठी तब्बल 9 तास लागले, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद असल्यामुळे आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही तर उद्याच्या पाणीपुरवठ्यावर देखील मोठा परिणाम होणार आहे.


महत्वाचं म्हणजे या अगोदर देखील काही महिन्यांपूर्वी एका सापामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. डीपीमध्ये साप गेल्याने यंत्रणेत बिघाड झाला  होता आणि त्याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला होता. वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Add Comment

Chandrashekar Bawankule : गगनचुंबी टॉवर व झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर

 महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा; मुंबईत 'मायक्रो झोनिंग' सर्वेक्षण सुरू मुंबई : एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि

सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी

Agriculture Minister Dattatreya Bharne : वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

मुंबई : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या

Maharashtra Kesari Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात!’ गाडीचा चक्काचूर; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचाव

सांगली : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब पटकावून कुस्तीविश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करणारा स्टार पैलवान

PM YOJANA : पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS); एनसीसी छात्रांसाठी सुवर्णसंधी

PUNE : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) महाराष्ट्र संचालनालयाने 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PMIS) अंतर्गत राज्यातील एनसीसी

Sikandar Shaikh car accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात; थारचा चक्काचूर, पैलवान थोडक्यात बचावला

सोलापूर : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज (Miraj) मार्गावर महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटू