पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने आळंदी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये सर्व चौकांत पोलीस मदत केंद्र कार्यरत केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बेवारसपणे ठेवल्या जाणाऱ्या संशयास्पद वस्तूंवर तसेच चोरांवर नजर ठेवण्यासाठी सुमारे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. वारी काळात मंगळवार (दि. १७) ते शुक्रवार (दि. २०) स्थानिक नोकरदार आणि भाविक दिंडीकऱ्यांच्या वाहना व्यतिरिक्त अन्य प्रकारच्या वाहनांना आळंदीत प्रवेश करण्यास मज्जाव केल्याची माहिती यावेळी आळंदी पोलीस प्रशासनाने दिली.

आळंदी शहरात सध्या भोसरी, मरकळ, चाकण, महाळुंगे, रांजणगाव औद्योगिक भागात ये-जा करणाऱ्या कंपन्या तसेच कामगारांच्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहनेही आता सुरू झाली आहेत. यामुळे नियोजनाचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी आणि त्यांच्या सहकारी अधिकारी यांनी आळंदीतील इंद्रायणी परिसर, देऊळ वाड्यास भेटी दिल्या.



आळंदीत वाहनतळ अपुरे असल्याने रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी केली जाणार नाहीत. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत त्यांनी त्यांच्याकडील वाहने धर्मशाळेत उभी करावीत. दिंड्यांची वाहने प्रस्थान काळात आळंदीत वाहनपास पाहून सोडण्यात येतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांना गुलाबी रंगाचा, तर दिंड्यांच्या वाहनांना पिवळ्या रंगाचा पास देण्यात येणार आहे.

...असा असेल बंदोबस्त


वारीसाठी यंदाच्या वर्षी सात सहायक पोलीस आयुक्त, ४२ पोलीस निरीक्षक, १६४ पोलीस उपनिरीक्षक, १३४० पोलीस अंमलदार, ६०० होमगार्डस, एनडीआरएफची एक तुकडी, बीडीडीएसच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी नेमल्या आहेत.
Comments
Add Comment

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर