Sim Card : मोबाईल सीमकार्ड स्विच करणे होणार सोपे

दूरसंचार विभागाने केले नियमात बदल


नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने सिम कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. दूरसंचार विभागाने या प्रक्रियेत बदल करत ३० दिवसांत पुन्हा एकदा रूपांतरणाची परवानगी दिली आहे. पूर्वी ही मर्यादा ९० दिवसांची होती.


नव्या नियमांनुसार, कनेक्शन स्विच केल्यानंतर (म्हणजे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड) केवळ ३० दिवसांत पुन्हा एकदा स्विच करता येईल. उदाहरणार्थ, जर प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये गेल्यावर ग्राहकाला तो प्लॅन आवडला नाही किंवा महाग वाटला, तर ३० दिवसांच्या आत पुन्हा प्रीपेडमध्ये येता येईल. पूर्वी यासाठी ९० दिवस थांबावे लागत होते. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही ३० दिवसांची सवलत केवळ पहिल्यांदाच मिळेल. त्यानंतर जर ग्राहकाला पुन्हा कनेक्शन बदलायचे असेल, तर पूर्वीप्रमाणेच ९० दिवसांची मर्यादा लागू होईल. म्हणजेच, ग्राहक वारंवार ३० दिवसांच्या आत बदल करू शकणार नाही.



जे ग्राहक ३० किंवा ९० दिवसांच्या मर्यादेपूर्वी आपले कनेक्शन बदलू इच्छितात, त्यांना ओटीपी प्रक्रियेचे पालन करावे लागेल. अनेकदा असे दिसून येते की, लोक प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये स्विच करतात, पण नंतर त्यांना प्लॅन महाग वाटू लागतो किंवा सेवेबद्दल ते समाधानी नसतात. अशावेळी पुन्हा प्रीपेडमध्ये जाण्यासाठी ९० दिवसांचा लॉक-इन कालावधी असल्याने त्यांना त्रास व्हायचा. दूरसंचार विभागाने ही अडचण आता दूर केली आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल आणि ते आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकतील अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय