Sim Card : मोबाईल सीमकार्ड स्विच करणे होणार सोपे

दूरसंचार विभागाने केले नियमात बदल


नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने सिम कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. दूरसंचार विभागाने या प्रक्रियेत बदल करत ३० दिवसांत पुन्हा एकदा रूपांतरणाची परवानगी दिली आहे. पूर्वी ही मर्यादा ९० दिवसांची होती.


नव्या नियमांनुसार, कनेक्शन स्विच केल्यानंतर (म्हणजे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड) केवळ ३० दिवसांत पुन्हा एकदा स्विच करता येईल. उदाहरणार्थ, जर प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये गेल्यावर ग्राहकाला तो प्लॅन आवडला नाही किंवा महाग वाटला, तर ३० दिवसांच्या आत पुन्हा प्रीपेडमध्ये येता येईल. पूर्वी यासाठी ९० दिवस थांबावे लागत होते. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही ३० दिवसांची सवलत केवळ पहिल्यांदाच मिळेल. त्यानंतर जर ग्राहकाला पुन्हा कनेक्शन बदलायचे असेल, तर पूर्वीप्रमाणेच ९० दिवसांची मर्यादा लागू होईल. म्हणजेच, ग्राहक वारंवार ३० दिवसांच्या आत बदल करू शकणार नाही.



जे ग्राहक ३० किंवा ९० दिवसांच्या मर्यादेपूर्वी आपले कनेक्शन बदलू इच्छितात, त्यांना ओटीपी प्रक्रियेचे पालन करावे लागेल. अनेकदा असे दिसून येते की, लोक प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये स्विच करतात, पण नंतर त्यांना प्लॅन महाग वाटू लागतो किंवा सेवेबद्दल ते समाधानी नसतात. अशावेळी पुन्हा प्रीपेडमध्ये जाण्यासाठी ९० दिवसांचा लॉक-इन कालावधी असल्याने त्यांना त्रास व्हायचा. दूरसंचार विभागाने ही अडचण आता दूर केली आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल आणि ते आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकतील अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

"साराभाई व्हर्सेस साराभाई" च्या कलाकारांनी सतीश शाह यांना दिला भावूक निरोप, अंत्यसंस्कारावेळी गायले शोचे टायटल साँग

मुंबई: किडनीच्या आजारामुळे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना निरोप

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही ५० रुपयांना

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प