Sim Card : मोबाईल सीमकार्ड स्विच करणे होणार सोपे

दूरसंचार विभागाने केले नियमात बदल


नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने सिम कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. दूरसंचार विभागाने या प्रक्रियेत बदल करत ३० दिवसांत पुन्हा एकदा रूपांतरणाची परवानगी दिली आहे. पूर्वी ही मर्यादा ९० दिवसांची होती.


नव्या नियमांनुसार, कनेक्शन स्विच केल्यानंतर (म्हणजे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड) केवळ ३० दिवसांत पुन्हा एकदा स्विच करता येईल. उदाहरणार्थ, जर प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये गेल्यावर ग्राहकाला तो प्लॅन आवडला नाही किंवा महाग वाटला, तर ३० दिवसांच्या आत पुन्हा प्रीपेडमध्ये येता येईल. पूर्वी यासाठी ९० दिवस थांबावे लागत होते. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही ३० दिवसांची सवलत केवळ पहिल्यांदाच मिळेल. त्यानंतर जर ग्राहकाला पुन्हा कनेक्शन बदलायचे असेल, तर पूर्वीप्रमाणेच ९० दिवसांची मर्यादा लागू होईल. म्हणजेच, ग्राहक वारंवार ३० दिवसांच्या आत बदल करू शकणार नाही.



जे ग्राहक ३० किंवा ९० दिवसांच्या मर्यादेपूर्वी आपले कनेक्शन बदलू इच्छितात, त्यांना ओटीपी प्रक्रियेचे पालन करावे लागेल. अनेकदा असे दिसून येते की, लोक प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये स्विच करतात, पण नंतर त्यांना प्लॅन महाग वाटू लागतो किंवा सेवेबद्दल ते समाधानी नसतात. अशावेळी पुन्हा प्रीपेडमध्ये जाण्यासाठी ९० दिवसांचा लॉक-इन कालावधी असल्याने त्यांना त्रास व्हायचा. दूरसंचार विभागाने ही अडचण आता दूर केली आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल आणि ते आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकतील अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने