Sim Card : मोबाईल सीमकार्ड स्विच करणे होणार सोपे

दूरसंचार विभागाने केले नियमात बदल


नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने सिम कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. दूरसंचार विभागाने या प्रक्रियेत बदल करत ३० दिवसांत पुन्हा एकदा रूपांतरणाची परवानगी दिली आहे. पूर्वी ही मर्यादा ९० दिवसांची होती.


नव्या नियमांनुसार, कनेक्शन स्विच केल्यानंतर (म्हणजे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड) केवळ ३० दिवसांत पुन्हा एकदा स्विच करता येईल. उदाहरणार्थ, जर प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये गेल्यावर ग्राहकाला तो प्लॅन आवडला नाही किंवा महाग वाटला, तर ३० दिवसांच्या आत पुन्हा प्रीपेडमध्ये येता येईल. पूर्वी यासाठी ९० दिवस थांबावे लागत होते. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही ३० दिवसांची सवलत केवळ पहिल्यांदाच मिळेल. त्यानंतर जर ग्राहकाला पुन्हा कनेक्शन बदलायचे असेल, तर पूर्वीप्रमाणेच ९० दिवसांची मर्यादा लागू होईल. म्हणजेच, ग्राहक वारंवार ३० दिवसांच्या आत बदल करू शकणार नाही.



जे ग्राहक ३० किंवा ९० दिवसांच्या मर्यादेपूर्वी आपले कनेक्शन बदलू इच्छितात, त्यांना ओटीपी प्रक्रियेचे पालन करावे लागेल. अनेकदा असे दिसून येते की, लोक प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये स्विच करतात, पण नंतर त्यांना प्लॅन महाग वाटू लागतो किंवा सेवेबद्दल ते समाधानी नसतात. अशावेळी पुन्हा प्रीपेडमध्ये जाण्यासाठी ९० दिवसांचा लॉक-इन कालावधी असल्याने त्यांना त्रास व्हायचा. दूरसंचार विभागाने ही अडचण आता दूर केली आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल आणि ते आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकतील अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

सॅमसंग इंडियाचा 'गॅलेक्‍सी ए०७ ५जी' लाँच

मुंबई : सॅमसंग या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्‍सी ए०७ ५जी लाँच केला. या

Barking Deer: तुम्ही पाहिलंत का कधी 'भुंकणारं हरीण'?; जाणून घ्या भुकणाऱ्या हरणाबद्दल

जर तुम्ही जंगलात किंवा डोंगराळ भागात असाल आणि अचानक तुम्हाला कुत्र्यासारखा भुंकण्याचा आवाज ऐकू आला तर

मेटाची अँटी स्कॅम मोहीम

मुंबई : 'मेटा अँटी-स्कॅम' (Meta Anti-Scam) हा मेटा कंपनीचा (Facebook, WhatsApp, Instagram) ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून

बारामतीमध्ये ग्लोबल शुगर एआय समिटचे आयोजन

बारामती : फाइंडेबिलिटी सायन्सेसने जाहीर केले आहे की ग्लोबल शुगर एआय समिट 2026 हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती,

Cancer Fighting Food In Ayurveda: आयुर्वेदातील कोणते पदार्थ कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतात, जाणून घ्या

मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते.

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित