राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात लागू केले नवीन नियम

शालेय बसचालकांची नियमित होणार मद्यपान आणि औषध चाचणी


पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात नवीन कडक नियम लागू केले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच हे खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. याअंतर्गत शालेय बसचालकांची पार्श्वभूमी कसून तपासली जाणार असून त्यांची नियमित मद्यपान आणि औषध चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कडक पावले उचलली आहेत. यानुसार बसचालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशा दोनवेळा मद्यपान व औषध चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.

या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. या नवीन नियमांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि अनुचित प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार