राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात लागू केले नवीन नियम

शालेय बसचालकांची नियमित होणार मद्यपान आणि औषध चाचणी


पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात नवीन कडक नियम लागू केले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच हे खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. याअंतर्गत शालेय बसचालकांची पार्श्वभूमी कसून तपासली जाणार असून त्यांची नियमित मद्यपान आणि औषध चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कडक पावले उचलली आहेत. यानुसार बसचालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशा दोनवेळा मद्यपान व औषध चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.

या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. या नवीन नियमांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि अनुचित प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद