राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास आनंदच होईल - उदय सामंत

नाशिक : महायुतीमध्ये नवीन कोणी आलं तर त्याचा आम्ही स्वागतच करू, असे स्पष्ट करून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की , ज्या पद्धतीप्रमाणे विमान अपघाताचे राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे मतदार त्यांना योग्य तो धडा शिकवतील.


राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावरती आले होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा नवीन सदस्य जर महायुतीमध्ये येणार असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू त्याच्यापासून महायुतीला चांगलाच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले की याचा आम्हाला आनंदच आहे. असे स्पष्ट करत ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा गट म्हणून नाहीतर पक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे आता गट हा समोरच्या बाजूला उरला आहे असे सांगून आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे त्यामुळे आम्ही भाजपा बरोबर महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत भाजपाने काय नारा दिला आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही तर महायुतीचे सदस्य म्हणून एकत्रित निवडणूक लढवू.

नाशिकमध्ये राजुर बहुला येथे 25 एकर जागेमध्ये आयटी पार्क होणार आहे त्यासाठीची जागा ही निश्चित करण्यात आली असून लवकरच या ठिकाणी आयटी पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे तर महानगरपालिकेने यापूर्वी केलेल्या 15 एकर जागेच्या संदर्भामध्ये देखील आम्ही लवकरच तेथील आयटी पार्कच्या कामाला देखील सुरुवात करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की नाशिक मध्ये लवकरच एक मोठी कंपनी येणार आहे त्या कंपनीच्या नावासंदर्भात त्यांनी कोणतीही घोषणा करण्यास स्पष्टपणे नकार दिला असून लवकर कंपनीचे बैठक होऊन नाशिकच्या योजनेची घोषणा केली जाईल असेही स्पष्ट करत

सामंत म्हणाले की, उद्योग विभाग हा कदापि दर्या खोऱ्यातील जागा घेणार नाही कारण त्या जागेचा आम्हाला काही उपयोग होणार नाही आमची ही स्पष्ट भूमिका असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

२२ जूनला मतमोजणी; स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर मुंबई : गेल्या अनेक

NEET Paper Leak Case : NEET निकालात ‘१८० पैकी १८०’चा दावा; नांदेडच्या क्लासवर CBIचा छापा

नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात