राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास आनंदच होईल - उदय सामंत

नाशिक : महायुतीमध्ये नवीन कोणी आलं तर त्याचा आम्ही स्वागतच करू, असे स्पष्ट करून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की , ज्या पद्धतीप्रमाणे विमान अपघाताचे राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे मतदार त्यांना योग्य तो धडा शिकवतील.


राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावरती आले होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा नवीन सदस्य जर महायुतीमध्ये येणार असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू त्याच्यापासून महायुतीला चांगलाच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले की याचा आम्हाला आनंदच आहे. असे स्पष्ट करत ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा गट म्हणून नाहीतर पक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे आता गट हा समोरच्या बाजूला उरला आहे असे सांगून आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे त्यामुळे आम्ही भाजपा बरोबर महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत भाजपाने काय नारा दिला आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही तर महायुतीचे सदस्य म्हणून एकत्रित निवडणूक लढवू.

नाशिकमध्ये राजुर बहुला येथे 25 एकर जागेमध्ये आयटी पार्क होणार आहे त्यासाठीची जागा ही निश्चित करण्यात आली असून लवकरच या ठिकाणी आयटी पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे तर महानगरपालिकेने यापूर्वी केलेल्या 15 एकर जागेच्या संदर्भामध्ये देखील आम्ही लवकरच तेथील आयटी पार्कच्या कामाला देखील सुरुवात करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की नाशिक मध्ये लवकरच एक मोठी कंपनी येणार आहे त्या कंपनीच्या नावासंदर्भात त्यांनी कोणतीही घोषणा करण्यास स्पष्टपणे नकार दिला असून लवकर कंपनीचे बैठक होऊन नाशिकच्या योजनेची घोषणा केली जाईल असेही स्पष्ट करत

सामंत म्हणाले की, उद्योग विभाग हा कदापि दर्या खोऱ्यातील जागा घेणार नाही कारण त्या जागेचा आम्हाला काही उपयोग होणार नाही आमची ही स्पष्ट भूमिका असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)