राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास आनंदच होईल - उदय सामंत

नाशिक : महायुतीमध्ये नवीन कोणी आलं तर त्याचा आम्ही स्वागतच करू, असे स्पष्ट करून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की , ज्या पद्धतीप्रमाणे विमान अपघाताचे राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे मतदार त्यांना योग्य तो धडा शिकवतील.


राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावरती आले होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा नवीन सदस्य जर महायुतीमध्ये येणार असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू त्याच्यापासून महायुतीला चांगलाच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले की याचा आम्हाला आनंदच आहे. असे स्पष्ट करत ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा गट म्हणून नाहीतर पक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे आता गट हा समोरच्या बाजूला उरला आहे असे सांगून आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे त्यामुळे आम्ही भाजपा बरोबर महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत भाजपाने काय नारा दिला आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही तर महायुतीचे सदस्य म्हणून एकत्रित निवडणूक लढवू.

नाशिकमध्ये राजुर बहुला येथे 25 एकर जागेमध्ये आयटी पार्क होणार आहे त्यासाठीची जागा ही निश्चित करण्यात आली असून लवकरच या ठिकाणी आयटी पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे तर महानगरपालिकेने यापूर्वी केलेल्या 15 एकर जागेच्या संदर्भामध्ये देखील आम्ही लवकरच तेथील आयटी पार्कच्या कामाला देखील सुरुवात करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की नाशिक मध्ये लवकरच एक मोठी कंपनी येणार आहे त्या कंपनीच्या नावासंदर्भात त्यांनी कोणतीही घोषणा करण्यास स्पष्टपणे नकार दिला असून लवकर कंपनीचे बैठक होऊन नाशिकच्या योजनेची घोषणा केली जाईल असेही स्पष्ट करत

सामंत म्हणाले की, उद्योग विभाग हा कदापि दर्या खोऱ्यातील जागा घेणार नाही कारण त्या जागेचा आम्हाला काही उपयोग होणार नाही आमची ही स्पष्ट भूमिका असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला