राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास आनंदच होईल - उदय सामंत

नाशिक : महायुतीमध्ये नवीन कोणी आलं तर त्याचा आम्ही स्वागतच करू, असे स्पष्ट करून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की , ज्या पद्धतीप्रमाणे विमान अपघाताचे राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे मतदार त्यांना योग्य तो धडा शिकवतील.


राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावरती आले होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा नवीन सदस्य जर महायुतीमध्ये येणार असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू त्याच्यापासून महायुतीला चांगलाच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले की याचा आम्हाला आनंदच आहे. असे स्पष्ट करत ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा गट म्हणून नाहीतर पक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे आता गट हा समोरच्या बाजूला उरला आहे असे सांगून आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे त्यामुळे आम्ही भाजपा बरोबर महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत भाजपाने काय नारा दिला आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही तर महायुतीचे सदस्य म्हणून एकत्रित निवडणूक लढवू.

नाशिकमध्ये राजुर बहुला येथे 25 एकर जागेमध्ये आयटी पार्क होणार आहे त्यासाठीची जागा ही निश्चित करण्यात आली असून लवकरच या ठिकाणी आयटी पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे तर महानगरपालिकेने यापूर्वी केलेल्या 15 एकर जागेच्या संदर्भामध्ये देखील आम्ही लवकरच तेथील आयटी पार्कच्या कामाला देखील सुरुवात करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की नाशिक मध्ये लवकरच एक मोठी कंपनी येणार आहे त्या कंपनीच्या नावासंदर्भात त्यांनी कोणतीही घोषणा करण्यास स्पष्टपणे नकार दिला असून लवकर कंपनीचे बैठक होऊन नाशिकच्या योजनेची घोषणा केली जाईल असेही स्पष्ट करत

सामंत म्हणाले की, उद्योग विभाग हा कदापि दर्या खोऱ्यातील जागा घेणार नाही कारण त्या जागेचा आम्हाला काही उपयोग होणार नाही आमची ही स्पष्ट भूमिका असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह