दुर्गाडी किल्ल्याच्या भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून, भीत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.


संबंधित पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने त्वरित घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर युद्धपातळीवर पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले. यामध्ये स्थानिक कामगार आणि संरक्षण तज्ज्ञांचा सहभाग असून, कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुर्गाडी किल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर एक जनआक्रोश कल्याणात उभा राहिला. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील कामाची पाहणी केली. आर्किटेक्चरनी या पडलेल्या भिंतीचा आढावा घेऊन अशा कामांमध्ये लाईम काँक्रिटीकरण केले जाईल असे सांगितले.


पावसाळा सुरू असल्यामुळे कामात थोडी दिरंगाई होईल; परंतु काम थांबणार नाही, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आता पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम खाते कडकडून जागे होऊन कामाला लागले आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून या कामात पुन्हा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे देखील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सुधाकर चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर या संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यातदेखील सुरू राहणार असून पावसाचा जोर जास्त असल्यास संरक्षण भिंतीच्या काम मंदावण्याची शक्यता आहे. मात्र लवकरच संरक्षण भितीचे काम करण्यात येणार असल्याचे मत वास्तुविशारद सपना लाखे यांनी
व्यक्त केले.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२