दुर्गाडी किल्ल्याच्या भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

  32

कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून, भीत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.


संबंधित पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने त्वरित घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर युद्धपातळीवर पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले. यामध्ये स्थानिक कामगार आणि संरक्षण तज्ज्ञांचा सहभाग असून, कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुर्गाडी किल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर एक जनआक्रोश कल्याणात उभा राहिला. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील कामाची पाहणी केली. आर्किटेक्चरनी या पडलेल्या भिंतीचा आढावा घेऊन अशा कामांमध्ये लाईम काँक्रिटीकरण केले जाईल असे सांगितले.


पावसाळा सुरू असल्यामुळे कामात थोडी दिरंगाई होईल; परंतु काम थांबणार नाही, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आता पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम खाते कडकडून जागे होऊन कामाला लागले आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून या कामात पुन्हा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे देखील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सुधाकर चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर या संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यातदेखील सुरू राहणार असून पावसाचा जोर जास्त असल्यास संरक्षण भिंतीच्या काम मंदावण्याची शक्यता आहे. मात्र लवकरच संरक्षण भितीचे काम करण्यात येणार असल्याचे मत वास्तुविशारद सपना लाखे यांनी
व्यक्त केले.

Comments
Add Comment

Video : कोस्टल रोडच्या बोगद्यात कार उलटली

मुंबई : कोस्टल रोडच्या बोगद्यात जोरदार पावसामुळे एक कार घसरून रस्त्याच्या मधोमध उलटल्याची घटना शुक्रवारी

मुंबईकरांनो रविवारी रेल्वे प्रवास करण्याआधी हे वाचा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि पनवेल ते

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता

मुंबई मेट्रो क्रमांक ९ मार्गिकेच्या कामाला वेग

दहिसर ते मीरा-भाईंदर मार्गाचे काम प्रगतिपथावर मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए)

कांदा धोरण ठरविण्यासाठी १९ सदस्यीय समितीची स्थापना

मुंबई : महाराष्ट्राने देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव,

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. १५ जून २०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी