दुर्गाडी किल्ल्याच्या भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

  46

कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून, भीत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.


संबंधित पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने त्वरित घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर युद्धपातळीवर पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले. यामध्ये स्थानिक कामगार आणि संरक्षण तज्ज्ञांचा सहभाग असून, कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुर्गाडी किल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर एक जनआक्रोश कल्याणात उभा राहिला. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील कामाची पाहणी केली. आर्किटेक्चरनी या पडलेल्या भिंतीचा आढावा घेऊन अशा कामांमध्ये लाईम काँक्रिटीकरण केले जाईल असे सांगितले.


पावसाळा सुरू असल्यामुळे कामात थोडी दिरंगाई होईल; परंतु काम थांबणार नाही, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आता पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम खाते कडकडून जागे होऊन कामाला लागले आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून या कामात पुन्हा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे देखील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सुधाकर चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर या संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यातदेखील सुरू राहणार असून पावसाचा जोर जास्त असल्यास संरक्षण भिंतीच्या काम मंदावण्याची शक्यता आहे. मात्र लवकरच संरक्षण भितीचे काम करण्यात येणार असल्याचे मत वास्तुविशारद सपना लाखे यांनी
व्यक्त केले.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना