Air India Plan Crash: सगळंच झालं खाक! पण ‘श्रीमद भगवद्गीता’ राहिली सुरक्षित

अहमदाबाद : अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या भीषण विमान अपघातात २४१ जणांनी प्राण गमावले असताना, या दुर्घटनेतील एक अत्यंत भावनिक क्षण समोर आला आहे. एअर इंडिया विमानाच्या जळून खाक झालेल्या अवशेषांमधून ‘श्रीमद भगवद्गीता’ ची प्रत सुरक्षित आणि अखंड अवस्थेत सापडली आहे.


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती श्रीमद भगवद्गीतेची पानं उलटताना दिसत आहे, अपघातात सर्व काही जळून राख झाले असताना भगवद्गीतेच्या प्रतीला त्याचा एकही दाह लागला नसल्याचे यामधून दिसून येते. या व्हिडिओने अनेकांच्या भावना उफाळून आल्या, याला अनेकांनी "दैवी चमत्कार" असे संबोधले आहे.


&

nbsp;

 

काल एअर इंडिया AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा झालेला दुर्दैवी अपघाताच्या बातमीने संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रवासी विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही क्षणांतच ते बी. जे. मेडिकल कॉलेजजवळील रहिवासी परिसरावर कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. या अपघातात केवळ विश्वास कुमार रमेश नामक प्रवासी अगदी चमत्कारिक रित्या बचावले गेले, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला.


दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी अपघात स्थळी तातडीने भेट दिली असून, विमान अपघात तपास संस्था (AAIB) कडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली असून, मृतांचे अवशेष ओळखण्यासाठी DNA तपासणी सुरू आहे. ही दुर्घटना केवळ मानवी हानीनेच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही संपूर्ण देशाला धक्का देणारी ठरली आहे. मात्र या भीषण घटनेत, भगवद्गीतेच्या प्रतीचे सुरक्षित सापडणे, एक आध्यात्मिक आशावाद निर्माण करून जाणारे आहे.

Comments
Add Comment

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक