अहमदाबाद: वडोदरा शहराच्या वाडी परिसरात राहणाऱ्या महेश्वरी कुटुंबातील घरात दोन दिवस आधी लग्नाचा आनंद होता. कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे लग्न १० जूनला कोर्ट मॅरेजच्या मदतीने झाले होते. मात्र त्याच घरात आता दुखा:चे वातावरण आहे. लग्नाच्या दोन दिवसांतच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.
भाविक महेश्वरी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये काम करत होते. ते दरवर्षी १५ दिवसांसाठी वडोदरा येथे आपल्या कुटुंबियांना भेटायला येत असतं. या वेळेस ते आले तेव्हा घरच्यांनी लग्नाचा आग्रहच धरला. भाविक यांचा आधीच साखरपुडा झाला होता. कुटुंबाच्या संमतीने १० जूनला त्यांचे कोर्टात लग्न झाले.
दोन दिवसांतच लग्नाचा आनंद दु:खात बदलला
लग्नानंतर भाविक यांच्या पत्नीने त्यांना हसत हसत बाय केले होते. कोणी विचारही केला नव्हता की ही त्यांची शेवटची भेट असेल. फ्लाईटमध्ये गेल्या काही तासातंच ही बातमी आली की अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर विमान क्रॅश आले. यात भाविक प्रवास करत होते.
या बातमीने माहेश्वरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अद्यापही आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे मान्य करण्यास तयार नाही. कुटुंबियांचे अश्रू थांबतच नाही आहेत. दोन दिवसांपूर्वी जिथे लग्नाची मिठाई वाटण्यात आली होती. तिथे आता भीषण शांतता आहे.
विमान अपघातात २५६ जणांचा मृत्यू
अहदमबादा येथून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातात विमानच नव्हे तर अनेक कुटुंबियांची स्वप्ने, भविष्ये जळून खाक झाली. या दुर्घटनेत २६५ जणांचा जीव गेला. कोणी आपला मुलगा गमावला तर कोणी आई, वडील आणि पती तर कोणी आपली मुलगी. अनेकजण तर असे होते जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले होते.