Ahmedabad plane crash: दोन दिवस आधी झाले होते लग्न, विमान अपघातात पुसले गेले कुंकू

  93

अहमदाबाद: वडोदरा शहराच्या वाडी परिसरात राहणाऱ्या महेश्वरी कुटुंबातील घरात दोन दिवस आधी लग्नाचा आनंद होता. कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे लग्न १० जूनला कोर्ट मॅरेजच्या मदतीने झाले होते. मात्र त्याच घरात आता दुखा:चे वातावरण आहे. लग्नाच्या दोन दिवसांतच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.


भाविक महेश्वरी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये काम करत होते. ते दरवर्षी १५ दिवसांसाठी वडोदरा येथे आपल्या कुटुंबियांना भेटायला येत असतं. या वेळेस ते आले तेव्हा घरच्यांनी लग्नाचा आग्रहच धरला. भाविक यांचा आधीच साखरपुडा झाला होता. कुटुंबाच्या संमतीने १० जूनला त्यांचे कोर्टात लग्न झाले.



दोन दिवसांतच लग्नाचा आनंद दु:खात बदलला


लग्नानंतर भाविक यांच्या पत्नीने त्यांना हसत हसत बाय केले होते. कोणी विचारही केला नव्हता की ही त्यांची शेवटची भेट असेल. फ्लाईटमध्ये गेल्या काही तासातंच ही बातमी आली की अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर विमान क्रॅश आले. यात भाविक प्रवास करत होते.


या बातमीने माहेश्वरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अद्यापही आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे मान्य करण्यास तयार नाही. कुटुंबियांचे अश्रू थांबतच नाही आहेत. दोन दिवसांपूर्वी जिथे लग्नाची मिठाई वाटण्यात आली होती. तिथे आता भीषण शांतता आहे.



विमान अपघातात २५६ जणांचा मृत्यू


अहदमबादा येथून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातात विमानच नव्हे तर अनेक कुटुंबियांची स्वप्ने, भविष्ये जळून खाक झाली. या दुर्घटनेत २६५ जणांचा जीव गेला. कोणी आपला मुलगा गमावला तर कोणी आई, वडील आणि पती तर कोणी आपली मुलगी. अनेकजण तर असे होते जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले होते.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी