Ahmedabad plane crash: सकाळी ८.३० वाजता पंतप्रधान मोदी पोहोचणार अहमदाबादला, अपघातस्थळाची करणार पाहणी

अहमदाबाद: अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला गुरूवारी अपघात झाला. या अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. एअरलाईनने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये दुजोरा दिला की विमानातील २४२ प्रवासीआणि क्रू मेंबर्सपैकी केवळ एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.


आज सकाळी ८.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे पोहोचतील. पंतप्रधान घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींनाही भेटतील. गुरूवारी अमित शाह यांनी घटनास्थळाचा दौरा केला होता.



विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू


गुरूवारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान क्रॅश झाले आणि मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चारही बाजूंनी धुराचे लोळ आणि मलबा पसरला होता. एकच हल्लाकल्लोळ झाला.


विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात २६५ मृतदेह आणण्यात आले. मृतांमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.


एक प्रवासी सुखरूप


विमान दुर्घटनेत एक प्रवासी सुखरूप असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रवाशाचे नाव रमेश विश्वास कुमार आहे. या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती