Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या लेकीचा मृत्यू!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी (१२ जून) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात २४२ प्रवासी होते. या विमान दुर्घटनेमध्ये (Air India Plane Crash In Ahmedabad) एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमानत मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले. त्यामुळे मोठी जीवित हानि झाली असून अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. विमानामधये भारतीय प्रवाशांसह ब्रिटन, पोर्तुगीज आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश होता. तसेच ज्या इमारतीला धडकून हे विमान कोळसले त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाती अनेक विद्यार्थ्यांनीही जीव गमावला. विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील काही विद्यार्थी अशा एकूण २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शोक व्यक्त होत आहे.


दरम्यान, याच दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये राहणारी एका तरूणीचाही मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर असलेल्या २७ वर्षीय रोशनी सोनघरेने आपला जीव गमावला. ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. मात्र कालच्या भीषण अपघातामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला.



रोशनीचं लहानपणापासूनच होते एअर क्रू बनण्याचं स्वप्न


मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत रोशनी सोनघरे राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते. मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.



रोशनीचे लहानापासूनच एअर कृ बनायचं होतं. जिद्द आणि मेहनत करत तिने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे कालची रोशनीची भेट अखेरची ठरली. डोंबिवलीकर लेकीचा विमान अपघातात जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांच्या शोकाला तर पारावर उरलेला नाही. सध्या तिच्या घराजवळ तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला. रोशनीचा भाऊ आणि तिचे वडील हे अहमदाबादला निघाले असून तिची आई पूर्णपणे दुःखात बुडाली आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे