बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. यासंदर्भात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे दि. ११ जून रोजी कारवाई करुन बनावट खतांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी संदीप यमाजी जाधव रा. पाथरे खुर्द याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना १० जून, २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की,पाथरे खुर्द येथील चैतन्य हार्डवेअर (वळण रोड, पाथरे खुर्द) मध्ये विनापरवाना खतांचा साठा असून त्यांची विक्री केली जात आहे. या गुप्त माहितीच्या आधारे, राहुल ढगे यांनी राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब अण्णासाहेब शिंदे आणि कृषी अधिकारी गणेश नारायण अनारसे यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथील गोदामात विक्रीसाठी ठेवलेल्या ५० किलोच्या गोण्या, १० किलोच्या बादलीतील खते आणि १ लिटर मधील द्रव खते मोठ्या प्रमाणात आढळून आली.


संदीप यमाजी जाधव, वय ४२ वर्षे, रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी, याची चौकशी केली असता, त्याच्याकडे खते विक्री आणि साठवणुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. तसेच त्याने खत खरेदीची बिले किंवा साठा नोंद वही (पुस्तक) यासारखी कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. या कारवाईत एकूण रु. ७ लाख ४९ हजार ७३० रुपए किमतीचा खतांचा साठा जप्त करण्यात आला. ज्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचा समावेश आहे.संदीप यमाजी जाधव याने विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने खतांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले असून हा साठा इतरत्र हलवू नये, अशा सूचना देण्यात आल्या. पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण