‘कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करा’

प्रादेशिक रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी


कर्जत:कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावरील गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते ते पूर्ववत चालू करावे अशी मागणी प्रादेशिक रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत (झेडआरयूसीसी) सदस्य नितीन परमार यांनी केली. कोविडपूर्वी, कर्जत रेल्वे स्थानकावर मुंबई सीएसटीएमला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते, ते सर्व थांबे पूर्ववत करावे. पत्रासोबत ट्रेनची यादी दिली आहे. खालील ४ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विचार करावा आणि २ नवीन एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावेत अशी मागणी बैठकीत केली.

कोयना एक्सप्रेस (११०३०) प्रगती एक्सप्रेस क्रॉसिंगमुळे कोयना एक्सप्रेस अनेकदा मुख्य मार्गावर उभी राहते. कोयना एक्सप्रेसला मुख्य मार्गाऐवजी कर्जत स्थानकावर थांबा दिल्यास प्रवाशांना सोयीचे होईल. मुख्य मार्गावर ट्रेन उभी असल्याने, लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी रुळांवर उतरू लागतात. त्यामुळे एखादा अनपेक्षित अपघात घडू शकतो.


कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस (११०५०) कोविड दरम्यान या ट्रेनचा फक्त कर्जत थांबा रद्द करण्यात आला होता, कोविडनंतर, ती सर्व थांब्यांवर थांबते, फक्त कर्जत येथे थांबा नाही. त्यामुळे कर्जत येथील थांबा पुन्हा सुरू करा. हैदराबाद मुंबई एक्सप्रेस (२२७३१) पुणे ते मुंबई प्रगती एक्सप्रेस त्यानंतर दुपारी ३.१५ वाजता डेक्कन एक्सप्रेस येते. या काळात कर्जत येथे कोणतीही एक्सप्रेस गाडी थांबत नाही. जर हैदराबाद एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल ते मुंबई एलटीटी (१२१६४) ला नियमित अंतराने कर्जत थांबा दिला तर कर्जत आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी ते सोयीचे होईल.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी