अहमदाबाद विमान अपघातावर पंतप्रधान मोदींची भावुक प्रतिक्रिया “अतिशय दु:खद घटना”!

  104

गुजरात : गुजरातमधील अहमदाबाद येथे एक भीषण विमान अपघात घडला असून, या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. लंडनकडे जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत हे विमान कोसळले. विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये भारतीय, ब्रिटिश, पोर्तुगीज आणि कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या प्रवाशांमध्ये २ नवजात बाळं आणि ११ लहान मुलं देखील होती.


हे विमान थेट एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले असून १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतरचे दृश्य अतिशय भयावह असून, विमानाचे अवशेष परिसरात विखुरलेले आहेत.


https://x.com/narendramodi/status/1933110947553681853

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर (X वर) प्रतिक्रिया देताना दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं, अहमदाबादमधील विमान अपघाताने मला मोठा धक्का बसला आहे. ही घटना अतिशय दु:खद आहे. माझ्या भावना या घटनेत प्रभावित झालेल्या सर्वांच्या सोबत आहेत. मी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.


घटनास्थळी NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल)च्या विविध टीम्स दाखल झाल्या असून ९० हून अधिक कर्मचारी मदतकार्य करत आहेत. बडोद्याहून आणखी एक टीम रवाना करण्यात आली आहे. सध्या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


ही दुर्घटना केवळ तांत्रिक चुकांपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण देशासाठी एक भावनिक हादरा ठरली आहे.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी