वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल, तर खबरदार!

  52

मनसेविरोधात संतप्त वृत्तपत्र विक्रेत्यांची ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने


ठाणे : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून उखडण्याची भाषा केली. जाधव यांचे हे वक्तव्य संतापजनक असून याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी बुधवारी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवला.

वास्तविक लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन, वारा, पावसात वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यत पोहोचवत असतात. तेव्हा, वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुळावर याल, तर खबरदार ! असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने दिला आहे.



मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तसेच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत; परंतु या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनात रेल्वे स्थानकातील वृतपत्र विक्री स्टॉल उखडण्याची केलेली भाषा अशोभनीय व अव्यवहार्य आहे.

दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली त्याबाबत बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी वृत्तपत्रांचे स्टॉल उखडून टाकणार अशी भाषा केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हाच एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे. त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी बुधवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात दिलीप चिंचोले,वैभव म्हात्रे, विवेक इसामे, निलेश कदम, संतोष शिंदे, केशव शिर्के, जितेंद्र क्षिरसागर, संदीप आवारे आदीसह अनेक वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते. यावेळी दत्ता घाडगे यांनी, मराठी माणसाच्या या व्यवसायावर गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत, अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे.
Comments
Add Comment

मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस

मुंबई  : मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.

राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात लागू केले नवीन नियम

शालेय बसचालकांची नियमित होणार मद्यपान आणि औषध चाचणी पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत

बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे.

Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील मनोविकारतज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. नितीन अभिवंत यांचे हिमालयातील

Rainy Season Picnic : पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू!

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके,

मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने