रेल्वेच्या २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारांवरील समितीने आज, बुधवारी रेल्वेच्या २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत ६ हजार ४०५ कोटी आहे. या प्रकल्पांमध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ७ जिल्ह्यांमधील ३१८ किमी लांबीचे रेल्वे जाळे तयार केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.


केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या पहिल्या प्रकल्पात कोडरमा-बरकाकाना या 133 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे. झारखंडमधील महत्त्वाच्या कोळसा उत्पादक क्षेत्रातून जाणारा हा रेल्वे मार्ग आहे. बिहारच्या पाटणा आणि झारखंडची राजधानी रांचीमधील सर्वात कमी अंतराचा रेल्वे दुवा आहे. तसेच दुसऱ्या प्रकल्पांतर्गत बल्लारी-चिक्काजाजूर या 185 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे.


हा प्रकल्प कर्नाटकातील बल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमधून तसेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जाईल. या प्रकल्पांमुळे 1408 गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे 28.19 लाख लोकांना सुलभ आणि जलद वाहतूक सुविधा मिळणार आहे. तसेच 49 मिलियन टन प्रतिवर्ष अतिरिक्त मालवाहतूक करण्याची क्षमता तयार होणार आहे. प्रकल्पाद्वारे कोळसा, लोखंड, सिमेंट, खते, शेतीमाल, पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या मालाच्या वाहतुकीला गती मिळेल असे वैष्णव यांनी सांगितले. रेल्वेचे आगामी दोन्ही प्रकल्प ‘पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत एकात्मिक नियोजनाच्या माध्यमातून अंमलात आणले जात आहेत. त्यामुळे केवळ वाहतूक सुधारणा नव्हे तर स्थानिक विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Comments
Add Comment

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या